AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

105 लाख टन ऊसाला 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, उतार कमीच

कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 105 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. तर या बदल्यात 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळालेले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उतार कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकच्या पावसाचा परिणाम ऊस उत्पादनावरही झाला आहे.

105 लाख टन ऊसाला 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन, उतार कमीच
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 4:46 PM
Share

मुंबई : ऊसाचा गळीत हंगाम सुरु होऊन बरोबर महिना झाला आहे. या महिन्याभराच्या कालावधीमध्ये राज्यातील 139 साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली होती. या कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत 105 लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. तर या बदल्यात 91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळालेले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उतार कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकच्या पावसाचा परिणाम ऊस उत्पादनावरही झाला आहे.

राज्यात ऊस कारखाने सुरु होण्यापूर्वी मंत्रीमंडळाची बैठक ही पार पडली होती. त्या दरम्यान, 15 ऑक्टोंबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. तर एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांची परवानगी ही नाकारण्यात आली होती. यानंतरही 139 साखर कारखान्यांच्या माध्यमातून हे गाळप करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक ऊसाचे गाळप झालेले आहे.

ऊसाची पळवापळवी झाली नाही

उस गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी साखर आयुक्त व मंत्रीमंडळाची बैठक पार पडली होती. त्या दरम्यान, जाहीर केलेल्या तारखेपूर्वी ऊसाचे गाळप सुरु झाले तर कारवाईचे संकेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार 15 ऑक्टोंबरपासून गाळप करण्याचे ठरले. मात्र, त्या पूर्वी गाळप सुरु करुन ऊसाची पळवापळवी कारखान्यांनी केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे केवळ 3 साखर कारखान्यांनी वेळेच्या आगोदर गाळप सुरु केले होते. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे साखर आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

असे झाले आहे ऊसाचे गाळप

कोल्हापूर विभागात 29 कारखान्यांनी 29.84 लाख टन ऊसगाळप करून 29.7 लाख क्विंटल साखर तयार केली आहे. पुणे विभागात 26 कारखान्यांनी 26.9 लाख टनाचे गाळप करून 24.5 लाख क्विंटल, तर सोलापूर पट्ट्यातील 31 कारखान्यांनी 19.1 लाख क्विंटल साखर तयार केली आहे. त्यासाठी 23.91 लाख टन उसाचे गाळप सोलापूर भागात केले गेले. ऊस गाळपात नगर जिल्हा पिछाडीवर दिसतो आहे. नगर विभागात 19 कारखाने सुरू झालेले आहेत. त्यांनी 13.36 लाख टन उसाचे गाळप करून 10.53 लाख क्विंटल साखर तयार केली आहे.

विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांना गाळपाची परवानगी नाकारण्यात आली होती. असे असतानाही मध्यंतरी काही साखर कारखाने हे सुरु असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. शिवाय राज्यातील तीन साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोंबर पूर्वीच गाळपाला सुरवात केली होती अशा साखर कारखान्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.

‘एफआरपी’ एकरकमेतच अदा करावी लागणार

थकीत ‘एफआरीपी’ ची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबत राज्य सरकारने मधला मार्ग काढला होता. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्याबाबत राज्य सरकारकडे शिफारस करण्यात आली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. शिवाय राज्य सरकारच्या या शिफारसीवर केंद्राने अद्यापपर्यंत कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे ‘एफआरपी’ रकमेचे तीन तुकडे न करता एकरकमीच रक्कम अदा करावी लागणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या :

आनंदवार्ता : सोयाबीन 6 हजाराच्या पार, शेतकऱ्यांचा संयम आला कामी

PM किसान योजनेत अनियमितता, महाराष्ट्रातील 4 लाख 45 हजार शेतकऱ्यांना द्यावा लागणार परतावा

सात दिवसांत 1 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घट, सरकारच्या निर्णयामुळेच शेतकऱ्यांचा वांदा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.