आता दोन कोटी शेतकऱ्यांचा होणार नाही ‘सन्मान’, राज्यांची कारवाई

शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची महत्वदायी योजना आहे. (PM) वर्षाकाठी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा होतात. मात्र, आता तब्बल 2 कोटी शेतकरी यामधून वगळले जाणार आहेत. अपात्र शेतकऱ्यांनीही याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानुसार (State Government) राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करुन अनेकांची नावे हटवली आहेत.

आता दोन कोटी शेतकऱ्यांचा होणार नाही 'सन्मान', राज्यांची कारवाई
किसान सन्मान योजनेचे संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 6:26 PM

मुंबई : शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची महत्वदायी योजना आहे. (PM) वर्षाकाठी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा होतात. मात्र, आता तब्बल 2 कोटी शेतकरी यामधून वगळले जाणार आहेत. अपात्र शेतकऱ्यांनीही याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानुसार (State Government) राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करुन अनेकांची नावे हटवली आहेत. (PM) ‘पीएम शेकरी सन्मान योजनेतील 9 वा हप्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वदायी योजना आहे. मात्र, यामध्ये अनेक अपात्र शेतकरी हे या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी ह्या दोन वर्षापासून दाखल झाल्या होत्या. एवढेच नाही तर मध्यंतरी केंद्रीय मंत्र्यांनीच 42 लाख अपात्र शेतकरी हे या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती संसदेत दिली होती. त्यानुसार छाननी केली असता 2 कोटी शेतकऱ्यांची नावे ही वगळण्यात आली आहेत. प्राप्तीकर भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी घेतलेली रक्कम परतही घेण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिकची होती. या पुर्वीचे अनुभव लक्षात घेता या सर्व राज्यांनी या योजनेतील शेतकऱ्यांची नावे छाननीसाठी घेतली होती. यामध्ये तब्बल 2 कोटी शेतकरी हे अपात्र होणार आहेत. तर 42 लाख अपात्रच शेतकरी लाभ घेत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री यांनीच संसदेत सांगितले होते. (2 crore farmers blocked by samman fund, Action of states)

देशात 12 कोटी 14 लाख लाभार्थी

देशात शेतकरी सन्मान योजनेचे 12 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. अनेक अपात्र शेतकऱ्यांनीही नाव नोंदवून या योजनेचा लाभ घेतला आहे. याबाबत तक्रारी दाखल होताच त्या संबंधित राज्यांनी छाननी करण्यास सुरवात केली होती. यामध्ये विविध राज्यातून 2 कोटी लाभार्थी हे अपात्र असल्याचे सांगण्यात आले आहे. तर 42 लाख हे यापूर्वीच अपात्र असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री यांनी संसदेत सांगितले होते.

‘त्या’ शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा नाहीत

चार महिन्यातून एकदा 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. ऑगस्ट – नोव्हेंबर महिन्यात या योजनेचा 9 वा टप्पा पार पडला. मात्र, यामध्ये केवळ 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरीत 2 कोटी अपात्र असल्याचे पीएम किसान पोर्टलवर सांगण्यात आले आहे.

लाभार्थीही राहत आहेत वंचित

अनेक अपात्र शेतकरी हे या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर राज्यसरकारने छाननी करून ही नावे बाजूला केली आहेत. 2 कोटींहून अधिक ही नावे आहेत. असे असले तरी पात्र असतानाही यादीतून वगळले असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या दाखल होऊ लागल्या आहेत. शिवाय गतवेळी अनेक शेतकऱ्यांसे पैसेही जमा झालेली नाहीत. (2 crore farmers blocked by samman fund, Action of states)

संबंधित इतर बातम्या :

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास 7 दिवस बाकी, शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी महसूल विभाग शेताच्या बांधावर

केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीवर शिक्कामोर्तब, उसाचा भाव 290 रुपये क्विंटल, 5 कोटी शेतकऱ्यांना फायदा

पीक विम्याच्या बीड पॅटर्नला केंद्राचा रेड सिग्नल, रब्बी हंगामासाठी तरी परवानगी द्यावी, दादा भुसेंची मागणी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.