AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पाण्याच्या शोधात असलेल्या 5 गायी पडल्या विहिरीत, गायींना वाचवताना शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी

हवामान विभागाने जरी अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढतच आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याचा शोधात असलेल्या 5 गायी थेट विहिरित पडल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारात घडली आहे. यापैकी शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर 4 गायींना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले मात्र, एका गायीचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

Video : पाण्याच्या शोधात असलेल्या 5 गायी पडल्या विहिरीत, गायींना वाचवताना शेतकऱ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी
विहिरित पडलेल्या गायीला वाचवताना शेतकऱ्यांना अथक परिश्रम करावे लागले.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Najir Khan
Reporter Najir Khan | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 04, 2022 | 3:09 PM
Share

परभणी :  (Meteorological Department) हवामान विभागाने जरी अवकाळी पावसाचा इशारा दिला असला तरी (Marathwada) मराठवाड्यात उन्हाचा पारा वाढतच आहे. वाढत्या उन्हामुळे जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाण्याचा शोधात असलेल्या 5 गायी थेट विहिरित पडल्याची घटना जिंतूर तालुक्यातील कोरवाडी शिवारात घडली आहे. यापैकी शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर 4 (Cow) गायींना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले मात्र, एका गायीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वाढत्या उन्हामुळे तहानलेल्या गाय़ी विहिरिवर आल्या आणि ही दुर्घटना झाली. मात्र, जनावरांवर असलेल्या शेतकऱ्याने लागलीच इतरांना बोलावून घेतल्याने इतर चार गायींना जीवदानच मिळाले आहे. वाढत्या उन्हाबरोबर आता पाण्याचे संकटही अधिक गडद होत आहे.

पाचही नील गायी, एकीचा मात्र मृत्यू

पाणी पिण्यासाठी विहिरीवर आलेल्या पाचही गायी ह्या निल जातीच्या होत्या. तहानलेल्या या गायींनी विहिरीचा अंदाजच आला नाही. शिवाय विहिरीला कुठे कठडा नसल्याने सर्वच्या सर्व गायी ह्या विहिरीत पडल्या. भर उन्हात एका शेतकऱ्याने जनावरे पाण्यावर आणली असता ही दुर्घटना झाली होती.

शेतकऱ्यांच्या प्रयत्नांची पराकष्टा

शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे जनावरांचा सांभाळ करीत असतो. शिवाय जनवरांसाठी तो काय करु शकतो याचा प्रत्यय कोरवाडी शिवारात आला. गायी पाण्यात पडल्याचे समजताच दोन शेतकऱ्यांनी थेट विहिरीतच उडी घेतली. कासरा(दोर) च्या सहायाने गायींच्या पोटाला बांधूले व काही शेतकऱ्यांनी गायींना ओढून घेतले. उन्हाच्या झळा असह्य होत असताना शेतकऱ्यांनी यातील 4 गायींचा जीव वाचवला. मात्र, एक गायी बराच वेळ विहिरीत राहिली. शिवाय वेळेत तिला बाहेर काढणेही शक्य झाले नाही. त्यामुळे एका गायीचा मृत्यू झाला तर चार गायी ह्या बाहेर काढण्यात आल्या आहेत.

दोन तास गायी पाण्यात

पाण्याच्या शोधात गेलेल्या गायी तब्बल दोन तास विहिरीत होत्या. शेतकरी लागलीच गोळा झाले पण एका-एका गायीला बाहेर काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले. यातच उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होत्या. अधिकचा वेळ गायी पाण्यात राहिल्याने एकीचा मृत्यू झाला तर इतर चार गायींना साधी जखम पण नाही.

संबंधित बातम्या :

EXport : फळपिकांच्या निर्यातीसाठी मराठवाड्यात उभारल्या जाणार पायाभूत सुविधा,कृषी विभागाचे नेमके धोरण काय?

Rabi Season: पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड, एका ठिकाणी बसून 2 एकरातील क्षेत्र निगराणीखाली

Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले

Follow Us
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!