AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाच्या नुकसान भरपाईचं सोडाच, दोन वर्षापासून आठशे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 800 शेतकरी हो गेल्या दोन वर्षापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाकडून दोनवेळा पंचनामे होऊनही पंढरपूर आणि माढा तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

यंदाच्या नुकसान भरपाईचं सोडाच, दोन वर्षापासून आठशे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 14, 2021 | 4:20 PM
Share

सोलापूर : सध्या शेतकऱ्यांची एकच गडबड आहे ती म्हणजे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात तक्रार नोंदवण्याची. याकरिता शेतकरी (Farmer) ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीचा अवलंब करीत आहे. (Online) पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात हेच चित्र आहे. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 800 शेतकरी हो गेल्या दोन वर्षापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाकडून दोनवेळा पंचनामे होऊनही पंढरपूर आणि माढा तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षापुर्वी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माढा तालुक्यातही अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आणि इतर अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. मात्र, यामधून तब्बल 800 शेतकरी हे वगळले गेले. इतर शेतकऱ्यांना मदत मिळाली हे 800 शेतकरी मदतीपासून दूर कसे असा सवाल उपस्थित झाला. दरम्यान, या 800 शेतकऱ्यांची नावेच यादीतून वगळली गेल्याची बाब समोर आली होती. यानंतर येथील लोकप्रतिनीधी यांच्या मागणीनुसार अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे दोनदा पंचनामे करण्यात आले होते.

या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक होते. परंतू, अजूनही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. आता संबंधित तहसीलदार आणि तलाठी यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत केव्हा मिळणार हा प्रश्न कायम आहे. यामध्ये एकूण 812 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांची धडपड, प्रशासन मात्र सुस्तच

खरिपातील उत्पादनातून नाही तर किमान नुकसान भरपाईच्या निधीतून तरी दिलासा मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदवलेली नाही. तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया ही किचकट असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तर कृषी विभाग आणि महसूलच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.

मनुष्यबळ नसल्यानेच शेतकऱ्यांचा ‘बळी’

पिक रक्कम कंपनीला जमा झाली की शेतकऱ्यांकडे ना कृषी विभागाचे लक्ष राहते ना विमा कंपनीचे. अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.

यंदाही 34 गावांमध्ये नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील 34 गावांमध्य़े यंदाही पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मोहोळ तालुक्यात झाले आहे. येथील 34 गावातील अडीच हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे. माढा तालुक्यातील 5 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा तरी अचूक पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत (800 farmers awaiting compensation for two years, picture of Solapur district)

संबंधित इतर बातम्या :

सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचं धुराडं तब्बल 13 वर्षानंतर पेटणार, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

शेतामध्येच टोमॅटोचा ‘लाल चिखल’, भाजीपाला कवडीमोल दरात

ई-पीक पाहणीच्या अंमलबजावणीची शेतकऱ्यांवर सक्ती नको, बच्चू कडूंकडून अडचणींचा पाढा, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष