AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना माती ना पाणी, अशी करा हवेत बटाट्याची शेती, कृषी संशोधकांना मिळाले मोठं यश

सबौर यांना एरोपोनिक तंत्रज्ञानाने बटाट्याची शेती करण्यात यश मिळालं. आता कृषी विद्यापीठात बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहेत. लवकरच बटाट्याचे हे बीयाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

ना माती ना पाणी, अशी करा हवेत बटाट्याची शेती, कृषी संशोधकांना मिळाले मोठं यश
| Updated on: Jun 16, 2023 | 3:53 PM
Share

नवी दिल्ली : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. बिहारमध्ये विशेषता कृषी विद्यापीठे अतिशय चांगले काम करत आहेत. बटाटे हे बहुतेक कोणत्याही भाजीसोबत घालता येतात. बटाट्याचे बायप्रोडक्सही करता येतात. बटाटे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे जास्त काळ टिकणारा भाजीपाला म्हणून बटाट्याकडे पाहिले जाते. बिहारचे शेतकरी आता एरोपोनिक पद्धतीने बटाट्याची शेती करतील. यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढेल. बिहार कृषी विद्यापीठात सबौर यांना एरोपोनिक तंत्रज्ञानाने बटाट्याची शेती करण्यात यश मिळालं. आता कृषी विद्यापीठात बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहेत. लवकरच बटाट्याचे हे बीयाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, एरोपोनिक शेती हे प्रगत शेतीचे तंत्रज्ञान आहे. या पद्धतीने शेती करण्यासाठी माती आणि पाण्याची गरज पडत नाही. हवेत रोपटे उगवतात. रोपांची मुळे हवेत लटकतात. त्या माध्यमातून त्यांना पोषक तत्व मिळतात. या पद्धतीने बटाट्याचे उत्पादन १० पट वाढते.

शेतकऱ्यांना दिले जाईल प्रशिक्षण

संशोधन चमूचे मुख्य कृषी संशोधक डॉ. रणधीर कुमार यांचे म्हणणे आहे की, एरोपोनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आधीपेक्षा खूप जास्त होईल. शिवाय बटाट्याचे उत्पादन वाढेल. एरोपोनिक पद्धतीला सरकारची मान्यता मिळाली आहे. या पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाईल. शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण राबवले जाईल.

चांगल्या दर्जाचे बटाटे उत्पादित होणार

सबौरचे कृषी संसोधक डॉ. रणधीर कुमार म्हणाले, एरोपोनिक पद्धतीने फक्त बटाटेच नाही, तर टमाटर, काकडी, स्ट्रॉबेरीसह अन्य कित्तेक जडी-बुटींची शेती केली जाऊ शकते. सध्या एरोपोनिक पद्धतीने बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहे. डॉ. रणधीर म्हणाले की, या पद्धतीने तयार केलेले बटाटे बीयाणे संक्रमणमुक्त राहतील. याचा अर्थ यावर होणाऱ्या आजाराचा परिणाम कमी होईल. यामुळे चांगल्या गुणवत्तेचे बटाटे तयार होतील.

या नवीन तंत्रज्ञानामुळे तांत्रिक पद्धतीने शिकून घेणाऱ्यांचा फायदा होणार आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता असे छोटेमोठे व्यवसाय करून चांगले उत्पन्म मिळू शकते. शिवाय स्वतः निर्माण केल्याचा आनंद काही औरच असतो. आपण मालक असल्याचा रुबाब असतो.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.