AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना माती ना पाणी, अशी करा हवेत बटाट्याची शेती, कृषी संशोधकांना मिळाले मोठं यश

सबौर यांना एरोपोनिक तंत्रज्ञानाने बटाट्याची शेती करण्यात यश मिळालं. आता कृषी विद्यापीठात बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहेत. लवकरच बटाट्याचे हे बीयाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

ना माती ना पाणी, अशी करा हवेत बटाट्याची शेती, कृषी संशोधकांना मिळाले मोठं यश
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 16, 2023 | 3:53 PM
Share

नवी दिल्ली : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. बिहारमध्ये विशेषता कृषी विद्यापीठे अतिशय चांगले काम करत आहेत. बटाटे हे बहुतेक कोणत्याही भाजीसोबत घालता येतात. बटाट्याचे बायप्रोडक्सही करता येतात. बटाटे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे जास्त काळ टिकणारा भाजीपाला म्हणून बटाट्याकडे पाहिले जाते. बिहारचे शेतकरी आता एरोपोनिक पद्धतीने बटाट्याची शेती करतील. यामुळे बटाट्याचे उत्पादन वाढेल. बिहार कृषी विद्यापीठात सबौर यांना एरोपोनिक तंत्रज्ञानाने बटाट्याची शेती करण्यात यश मिळालं. आता कृषी विद्यापीठात बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहेत. लवकरच बटाट्याचे हे बीयाणे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

न्यूज १८ हिंदीच्या रिपोर्टनुसार, एरोपोनिक शेती हे प्रगत शेतीचे तंत्रज्ञान आहे. या पद्धतीने शेती करण्यासाठी माती आणि पाण्याची गरज पडत नाही. हवेत रोपटे उगवतात. रोपांची मुळे हवेत लटकतात. त्या माध्यमातून त्यांना पोषक तत्व मिळतात. या पद्धतीने बटाट्याचे उत्पादन १० पट वाढते.

शेतकऱ्यांना दिले जाईल प्रशिक्षण

संशोधन चमूचे मुख्य कृषी संशोधक डॉ. रणधीर कुमार यांचे म्हणणे आहे की, एरोपोनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न आधीपेक्षा खूप जास्त होईल. शिवाय बटाट्याचे उत्पादन वाढेल. एरोपोनिक पद्धतीला सरकारची मान्यता मिळाली आहे. या पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाईल. शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण राबवले जाईल.

चांगल्या दर्जाचे बटाटे उत्पादित होणार

सबौरचे कृषी संसोधक डॉ. रणधीर कुमार म्हणाले, एरोपोनिक पद्धतीने फक्त बटाटेच नाही, तर टमाटर, काकडी, स्ट्रॉबेरीसह अन्य कित्तेक जडी-बुटींची शेती केली जाऊ शकते. सध्या एरोपोनिक पद्धतीने बटाट्याचे बीयाणे तयार केले जात आहे. डॉ. रणधीर म्हणाले की, या पद्धतीने तयार केलेले बटाटे बीयाणे संक्रमणमुक्त राहतील. याचा अर्थ यावर होणाऱ्या आजाराचा परिणाम कमी होईल. यामुळे चांगल्या गुणवत्तेचे बटाटे तयार होतील.

या नवीन तंत्रज्ञानामुळे तांत्रिक पद्धतीने शिकून घेणाऱ्यांचा फायदा होणार आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता असे छोटेमोठे व्यवसाय करून चांगले उत्पन्म मिळू शकते. शिवाय स्वतः निर्माण केल्याचा आनंद काही औरच असतो. आपण मालक असल्याचा रुबाब असतो.

Follow Us
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...