AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : शेतकरी आणि आदिवासींचा विविध मागण्यांसाठी मुंबईत आलेला ‘उलगुलान मोर्चा’ आज मंत्रालयावर धडकणार आहे. सोमय्या मैदानात रात्र काढल्यानंतर पहाटे शेतकरी आणि आदिवासींनी आझाद मैदानाकडे कूच केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ‘जेल भरो’ करणार असल्याचा इशाराही आंदोलक शेतकरी, आदिवासांनी दिला आहे. LIVE UPDATE : – जमीनपट्ट्यासंदर्भातील विषय महत्त्वाचा आहे – गिरीश महाजन – विखे […]

LIVE : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

मुंबई : शेतकरी आणि आदिवासींचा विविध मागण्यांसाठी मुंबईत आलेला ‘उलगुलान मोर्चा’ आज मंत्रालयावर धडकणार आहे. सोमय्या मैदानात रात्र काढल्यानंतर पहाटे शेतकरी आणि आदिवासींनी आझाद मैदानाकडे कूच केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ‘जेल भरो’ करणार असल्याचा इशाराही आंदोलक शेतकरी, आदिवासांनी दिला आहे.

LIVE UPDATE :

– जमीनपट्ट्यासंदर्भातील विषय महत्त्वाचा आहे – गिरीश महाजन

– विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबत 15 जणांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

– शेतकऱ्यांचं 15 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

– दहा ते वीस मिनिटात #उलगुलानमोर्चा आझाद मैदानात पोहोचेल

– शेतकरी, आदिवासींचा मोर्चा भायखळ्याच्या पुढे पोहोचला, आझाद मैदानाकडे कूच

– आदिवासी आणि शेतकरी मोर्चा भायखळ्यातील राणीबाग येथे पोहचला

मोर्चामुळे वाहतुकीत बदल :

  • दक्षिण मुंबईहून दादरकडे येणाऱ्या वाहनांना सर्व्हिस रोडचा वापर करण्याचं मुंबई पोलिसांचे आवाहन
  • जे जे फ्लाईओवर, लालबाग फ्लायओव्हर आणि परेल फ्लायओव्हरवर येथून वाहतूक प्रवास टाळावी
  • सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु
  • सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान आझाद मैदान परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

मागण्या काय?

1) उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव मिळावा व तो मिळण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करण्यात यावी.

2) पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे. व त्यानंतर त्यांच्या जमिनी सुधारण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून त्याचा आराखडा सादर करावा

3) विजेवर सर्वांचा समान अधिकार असल्यामुळे शहराप्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा समान लोड शेडींग असावी. व शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा

4) वनपट्टे धारकांना व ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पिक कर्ज मिळावे. कारण ही मदत एकूण शेती व्यवसाय तोट्यात असल्यामुळे देण्यात येते त्यामुळे त्यांचा या मदतीवर अधिकार आहे.

5) पेसा कायद्यामध्ये शेड्युल्ड 5 अंतर्गत येणाऱ्या गावांची पुनर्रचना करून वगळण्यात आलेली गावे समाविष्ट करून घेण्यात यावी .

6) दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांनी आता केलेले शुल्क परत मिळावे.

7) दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यावरील असा भेदभाव न करता सरसकट दोन रुपये किलोने धान्य मिळावे.

8) आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्‍टरी 50हजार व बागायत जमिनीला हेक्टरीएक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे

9) 2001 पूर्वी कसत असलेल्या गायरान जमीन धारकांना कायदेशीर पूर्तता करून कसत असलेल्या गायरान जमिनी चे त्यांना मालक बनविण्यात यावे व तोपर्यंत त्यांना पिक कर्ज नुकसान भरपाई हे लाभ देण्यात यावे

10) दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजना या अंतर्गत महाराष्ट्रात येत्या काळात किती दलित व आदिवासिंना जमीन मिळणार आहे याचा आराखडा सादर करावा.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.