AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : पावसामुळं शिवाराचं चित्र बदललं, नांदेडात कधी नव्हे ते धान पीक बहरलं..!

काळानुरुप शेतीचे चित्र बदलत आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातही गावरान भात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मराठावाड्यावर निसर्गाची कायम अवकृपाच राहिलेली होती. तेलंगणा सीमावर्ती भाग असलेल्या नांदेडच्या या तिन्ही तालुक्यात गावरानी तांदळाची शेती पूर्वी मोठ्या प्रमाणात होत असे मात्र मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातशेती मध्ये मोठी घट झाली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे.

Nanded : पावसामुळं शिवाराचं चित्र बदललं, नांदेडात कधी नव्हे ते धान पीक बहरलं..!
अधिकच्या पावसामुळे मराठवाड्यात पीक पध्दतीमध्ये बदल झाला आहे. नांदेड जिल्ह्यात भातशेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jul 23, 2022 | 9:14 AM
Share

नांदेड : (Crop Change) पीक पध्दतीमध्ये बदल उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. केवळ पारंपरिक पिकांवरच भर न देता नगदी पिकांचेही क्षेत्र वाढत आहे. यंदा सरासरीपेक्षा (Heavy Rain) अधिकच्या पावसाने नांदेड जिल्ह्यात भात शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. (Paddy Crop) धान पिकाच्या लागवडी दरम्यानच अधिकच्या पावसाची गरज असते. यंदा मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हा नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. त्याचा परिणाम आता पाहवयास मिळत असून खरिपतील सोयाबीन, तूर, कापसाबरोबर जिल्ह्यातील सीमावर्ती भागामध्ये भात शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचा उद्देश साध्य होईल असेच सध्याचे वातावरण आहे.

सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा प्रयोग

अतिवृष्टीमुळे खरिपातील काही पिकांना धोका निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातील पीक पध्दतीमध्ये बदल होण्यास हा पाऊसच कारणीभूत आहे. अधिकच्या पावसामुळे धर्माबाद-बिलोली आणि देगलूर तालुक्यात अगदी कोकणाप्रमाणे भातशेतीने परिसर हिरवागार झालाय. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हरफलो झाल्याने भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांत यंदा वाढ झाल्याचे दिसतंय. शिवाय सध्याच्या पोषक वातावरणामुळे पिकाची जोमात वाढही होत आहे.

गवरान भात शेतीची होती परंपरा

काळानुरुप शेतीचे चित्र बदलत आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातही गावरान भात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मराठावाड्यावर निसर्गाची कायम अवकृपाच राहिलेली होती. तेलंगणा सीमावर्ती भाग असलेल्या नांदेडच्या या तिन्ही तालुक्यात गावरानी तांदळाची शेती पूर्वी मोठ्या प्रमाणात होत असे मात्र मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातशेती मध्ये मोठी घट झाली होती. आता पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. यंदा तर हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी अशा पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यात भात शेतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. नांदेडकरांना गावरानी तांदळाची चव चाखता येणार आहे.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

जून महिन्यात गायब झालेला पाऊस जुलैच्या पहिल्या दिवसापासून असा काय बरसलेला आहे की शेती चित्रच बदलले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही नांदेड जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकरी आता नवनवीन प्रयोग करीत आहे. गेल्या 4 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असली तरी पुढील दोन दिवस मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा फायदा भातशेतीला होईल मात्र, इतर पिकांचे नुकसान हे ठरलेले आहे.

Follow Us
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!