Nashik : लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ

बाजार भावात उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी निघणे मुश्किल झाले आहे, एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला 30 ते 40 हजार रुपये सुद्धा मिळणार नसल्याने तोट्यात कांदा विक्री करावे लागत आहे.

Nashik : लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 3:17 PM

उमेश पारीक, नाशिक : आशिया खंडातील (Continent of Asia) कांद्याची अग्रेसर बाजारपेठ (onion market) म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली असून लाल कांद्याचे सरासरी बाजार भाव 600 ते 800 रुपये पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने चिंताग्रस्त झाला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु दर घसरल्यापासून शेतकरी व्यथा बोलून दाखवत आहेत.

600 ते 800 रुपयांपर्यंत बाजार भाव

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत आहे, तसेच विदेशात निर्यातीला ही अपेक्षित मागणी नसल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज 800 वाहनातून 16 हजार 200 क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. या कांद्याला जास्तीत जास्त 1380 रुपये, कमीतकमी 500 रुपये तर सरासरी 960 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव जरी मिळताना दिसत असेल मात्र सरासरी 600 ते 800 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळत आहे.

सरासरी बाजार भाव मिळाला पाहिजे

बाजार भावात उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी निघणे मुश्किल झाले आहे, एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला 30 ते 40 हजार रुपये सुद्धा मिळणार नसल्याने तोट्यात कांदा विक्री करावे लागत आहे. घरात लग्न कार्य कसे करावे यासह अनेक समस्या शेतकरी कुटुंबाला भेडसावत असल्याने पंधराशे ते दोन हजार रुपये सरासरी बाजार भाव मिळाला पाहिजे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी प्रदीप न्याहारकर करत आहे.

हे सुद्धा वाचा

सकाळी पडणाऱ्या धुक्याने कांदा उत्पादक चिंतेत

कसमादे पट्ट्यात यंदा कांद्याचे पीक जोमदार आहे. परंतु धुक्याच्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. या हवामानाचा चांगलाच धसका शेतकरी यांनी घेतला आहे. अत्यंत कष्टातून उभारलेले हे पीक ढगाळ वातावरणामुळे खराब होण्याची भिती निर्मिण झाली आहे. कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत मोठे कष्टाचे पीक आता झालेले आहे. गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण, धुके व सकाळी दव पडत असल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान होते की काय? या काळजीत कांदा उत्पादक आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.