AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालव्याच्या पाण्यामुळं 22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी

भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील विविध भागात मागील अनेक वर्षांपासून कालव्याचं बांधकाम हे कासव गतीने सुरू आहे. या कामाचं कंत्राट असणाऱ्या कंपनीकडून अचानक पाणी सोडण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

कालव्याच्या पाण्यामुळं  22 एकरातील धानाचं नुकसानं, शेतकऱ्यांकडून ठेकेदाराकडे नुकसानभरपाईची मागणी
22 एकर धान शेतीचं नुकसान
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 2:28 PM
Share

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील विविध भागात मागील अनेक वर्षांपासून कालव्याचं बांधकाम हे कासव गतीने सुरू आहे. या कामाचं कंत्राट असणाऱ्या कंपनीकडून अचानक पाणी सोडण्यात आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. 22 एकरावरील धानाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे यामुळं धान उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी केली असता मदतीचं आश्वासन दिलं आहे. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.

हाता तोंडाशी आलेलं धान हातचं गेलं

लाखनी तालुक्यातील कोलारा, मुरमाडी तूप येथे बांधकाम सुरू करण्यासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले. बांधकाम सुरू करण्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानं आल्याने कोलारा व परिसरातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक गेलं आहे. पाणी शेतात आल्याने धानपीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धानातही पाणी साचले आहे.जवळपास 22 एकर क्षेत्रातील धानपिकला या पाण्याचा फटका बसला आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांचंही नुकसान

अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातील धान जलमय झाले आहे. 22 एकरावरील धानाचं नुकसान झाल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला असता त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे नुकसान झाले आहे. त्यांची आम्ही नुकसान भरपाई करणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी एकरी पंधरा क्विंटल प्रमाणं नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केलीय. नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु देणार नसल्याचं गुणवंत बावनकुळे या शेतकऱ्यानं सांगितलं. शेतकऱ्यांना धान उचलण्यासाठी लागणारा खर्च नुकसानभरपाई म्हणून द्यायला तयार असल्याचं कंत्राटदार योगेश ब्राम्हणकर यांनी सांगितलं आहे.

हिंगोलीत वातावरणीय बदलाचा रब्बीच्या पिकांना फटका

हिंगोलीत मागील दोन दिवसापासून आकाशात ढग दादूत येत आहेत. त्यामुळं याचा रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसतांना दिसतोय, हिंगोलीत हरभरा पिकांवर मर नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे. तर तुरीच्या फुलांची मोठी गळती होत असल्याने तुरीच्या पिकांना देखील फटका बसताना दिसत आहे.

इतर बातम्या:

NAS 2021 : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण यशस्वी, 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थी सहभागी

NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात

Bhandara water of canal lodge in 22 acer farm farmers demanded compensation form contractor

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.