AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Market: मिरची बाजारात ‘तेजी’, विक्रमी दर मिळून होईल का नुकसानाची भरपाई?

मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नंदुरबार मार्केटची ओळख आहे. केवळ जिल्ह्यातीलच नाही सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरची बाजारपेठेत दाखल होत असते. यंदा मात्र, बाजारपेठेतले वेगळेच चित्र आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादनात मोठी घट झाल्यानेच लाल मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत.

Nandurbar Market: मिरची बाजारात 'तेजी', विक्रमी दर मिळून होईल का नुकसानाची भरपाई?
नंदुबार बाजार समितीमध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत असल्याने आवक वाढली आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 14, 2022 | 10:14 AM
Share

नंदुरबार : मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून (Nandurbar Market) नंदुरबार मार्केटची ओळख आहे. केवळ जिल्ह्यातीलच नाही सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरची बाजारपेठेत दाखल होत असते. यंदा मात्र, बाजारपेठेतले वेगळेच चित्र आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे (Chilly Market) मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादनात मोठी घट झाल्यानेच (Red Chilly Rate) लाल मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत. ओल्या लाल मिरचीला 8 हजार रुपये तर कोरड्या लाल मिरचीचे दर 17 हजार 500 वर गेले आहेत. दरात वाढ झाली तरी उत्पादन हे निम्म्याहून कमी झाल्याने याचा फारसा फायदा होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय भविष्यात मिरचीची आवक घटली तर दरात अणखीन वाढ होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव अमृतकर यांनी सांगितले आहे. उत्पादनात घट झाली तर काय दरावर काय परिणाम होतात याचा प्रत्यय सध्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळत आहे.

बाजारात तेजी, उत्पादनात मात्र घट

मिरचीला विक्रमी दप मिळत असल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा असे वाटत असेल तर तुमचा तो गैरसमज आहे. कारण उत्पादनात निम्म्याहून अधिकची घट झाली आहे. त्यामुळे विक्रमी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ओल्या मिरचीसह वाळलेल्या मिरचीची आवक सुरु झाली आहे. ओल्या लाल मिरचीला बाजार समितीमध्ये कमाल 3 हजार 500 तर किमान 8 हजार 500 असा दर मिळत आहे. हे दर वाढीव असले तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना याचा अधिकचा लाभ होतोय असे नाही. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे खर्चही अधिक झालेला होता.

1लाख 65 हजार क्विंटल मिरचीची आवक

नंदुरबार ही मिरचीची मुख्य बाजारपेठ आहे. केवळ्या जिल्ह्यातूनच नाही तर सीमालगतच्या इतर राज्यातूनही मिरचीची आवक होते. शिवाय ओली मिरचीची तोडणी झाली की लागलीच विक्री करावी लागते. त्यामुळे सध्या आवक होत असल्याने आतापर्यंत 1 लाख 65 हजार क्विंटलची आवक झाली आहे. आकडेवारीत ही आवक अधिकची असली तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने भविष्यात याचे परिणाम दिसणार आहे. शिवाय सध्याच्या दरामुळे शेतकऱ्यांनी वाळलेली मिरची साठवण्यापेक्षा विक्रीवरच भर दिला आहे.

दक्षिण भारतात उत्पादनात घट

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमधूनही मिरचीची आवक होत असते. येथील चोख व्यवहार आणि दराची हमी यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा नंदुरबारकडेच राहिलेला आहे. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणातून कोणत्याच पिकाची सुटका झालेली नाही. त्यामुळे हंगामी पीक असलेल्या मिरची उत्पादनातही मोठी घट झाली आहे. भविष्यात अणखीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

Cotton: कापसाचे उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना सावरले, हंगामाच्या अंतिम टप्प्यात काय आहे स्थिती?

PM Kisan Yojna: शेतकऱ्यांनो 10 वा हप्ता जमा झाला नसेल तर 11 व्या हप्त्याचीही वाट बिकट..! ही प्रक्रिया करावीच लागणार

कोरफडची एकदा लागवड बारमाही उत्पन्न, शेतकऱ्यांना व्यवसयाचीही संधी, जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..