AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटाचा फटका, सांगलीत शेतकऱ्याला 25 लाखांचं नुकसान, 10 एकर पेरू बागेवर कुऱ्हाड

लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका फळाबागायत शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांवर तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव घालण्याची वेळ आलीय.

लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटाचा फटका, सांगलीत शेतकऱ्याला 25 लाखांचं नुकसान, 10 एकर पेरू बागेवर कुऱ्हाड
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 9:04 PM
Share

सांगली : लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका फळाबागायत शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांवर तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव घालण्याची वेळ आलीय. महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. एकाचवेळी आसमानी आणि सुलतानी संकटांनी घेरल्यानं हा शेतकरी कर्जबाजारी झाला. हाताशी मुबलक शेती असतानाही निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध या परिस्थिती शेती अडकली. यातूनच लावलेल्या बागेतून उत्पन्न कमी आणि कर्जच वाढत असल्यानं त्यांनी अखेर बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

“बागेत पेरूचे उत्पन्न सुरू झाले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला”

महेंद्रसिंह शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी मिरज बेडग रोडजवळ असलेल्या 10 एकर शेतात लखनौ सरदार या जातीच्या पेरूची बाग लागवड केली होती. त्यावेळी साडे सात हजार पेरूची रोपं लागवड करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च आला होता. या पेरूच्या बागेपासून वार्षिक 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी आशा होती. बागेत पेरूचे उत्पन्न सुरू झाले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला.

“शासनाकडून पंचनामे झाले, मात्र अद्याप मदत नाहीच”

लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी शेतातील पेरू विकतच घेतले नाही. त्यामुळे पेरू झाडावरच सडले. यावर्षी तर बागेचा खर्च तरी निघेल असं वाटत होतं. पण अवकाळी आणि वादळी पावसाने आलेली फळे गळून गेली आणि मोठं नुकसान झालं. इतकी संकटं आल्यानंतर शासनाने पंचनामे केले, पण मदत काही दिली नाही, अशी तक्रार या शेतकऱ्याने केलीय. मदत न मिळाल्यानं अखेर सतत होणारं नुकसान टाळण्यासाठी संतप्त झालेल्या बागायतदार महेंद्रसिंह शिंदे यांनी 10 एकर बागेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. आज पेरूच्या फळासोबत 10 एकर बाग त्यांनी तोडून काढली आहे.

आता तरी शासनाने लक्ष द्यावे, शेतकऱ्याची विनवणी

शासन बागायतदार शेतकऱ्यांना मदत करतो, असे आश्वासन देते. प्रत्यक्षात मात्र, कोणतीही मदत मिळाली नाही. भारत कृषी प्रधान देश म्हटला जातो, पण कृषी व्यवसायाला मदत होत नाही. लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेवटी या झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे. आता तरी शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी महेंद्रसिंह शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा :

जळगावमध्ये तुफान पावसानं शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह पुरात वाहून गेलं, बैलांचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता

राज्यात फलोत्पादनवाढीसाठी दिलेल्या शरद पवारांच्या सूचनांवर अंमलबजावणी करणार : अजित पवार

ई-नाम प्लॉटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार, 1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी , नरेंद्र तोमर यांची माहिती

व्हिडीओ पाहा :

Big loss of guava farmer Sangli due to lockdown and natural calamities

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.