AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटाचा फटका, सांगलीत शेतकऱ्याला 25 लाखांचं नुकसान, 10 एकर पेरू बागेवर कुऱ्हाड

लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका फळाबागायत शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांवर तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव घालण्याची वेळ आलीय.

लॉकडाऊन आणि नैसर्गिक संकटाचा फटका, सांगलीत शेतकऱ्याला 25 लाखांचं नुकसान, 10 एकर पेरू बागेवर कुऱ्हाड
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 9:04 PM
Share

सांगली : लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील मिरजेत एका फळाबागायत शेतकऱ्याचं 25 लाख रुपयांचं नुकसान झालं. त्यामुळे या शेतकऱ्यांवर तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव घालण्याची वेळ आलीय. महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. एकाचवेळी आसमानी आणि सुलतानी संकटांनी घेरल्यानं हा शेतकरी कर्जबाजारी झाला. हाताशी मुबलक शेती असतानाही निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध या परिस्थिती शेती अडकली. यातूनच लावलेल्या बागेतून उत्पन्न कमी आणि कर्जच वाढत असल्यानं त्यांनी अखेर बाग तोडण्याचा निर्णय घेतला.

“बागेत पेरूचे उत्पन्न सुरू झाले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला”

महेंद्रसिंह शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी मिरज बेडग रोडजवळ असलेल्या 10 एकर शेतात लखनौ सरदार या जातीच्या पेरूची बाग लागवड केली होती. त्यावेळी साडे सात हजार पेरूची रोपं लागवड करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च आला होता. या पेरूच्या बागेपासून वार्षिक 15 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी आशा होती. बागेत पेरूचे उत्पन्न सुरू झाले आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला.

“शासनाकडून पंचनामे झाले, मात्र अद्याप मदत नाहीच”

लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांनी शेतातील पेरू विकतच घेतले नाही. त्यामुळे पेरू झाडावरच सडले. यावर्षी तर बागेचा खर्च तरी निघेल असं वाटत होतं. पण अवकाळी आणि वादळी पावसाने आलेली फळे गळून गेली आणि मोठं नुकसान झालं. इतकी संकटं आल्यानंतर शासनाने पंचनामे केले, पण मदत काही दिली नाही, अशी तक्रार या शेतकऱ्याने केलीय. मदत न मिळाल्यानं अखेर सतत होणारं नुकसान टाळण्यासाठी संतप्त झालेल्या बागायतदार महेंद्रसिंह शिंदे यांनी 10 एकर बागेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. आज पेरूच्या फळासोबत 10 एकर बाग त्यांनी तोडून काढली आहे.

आता तरी शासनाने लक्ष द्यावे, शेतकऱ्याची विनवणी

शासन बागायतदार शेतकऱ्यांना मदत करतो, असे आश्वासन देते. प्रत्यक्षात मात्र, कोणतीही मदत मिळाली नाही. भारत कृषी प्रधान देश म्हटला जातो, पण कृषी व्यवसायाला मदत होत नाही. लॉकडाऊन व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेवटी या झाडावर कुऱ्हाडीचे घाव घालण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे. आता तरी शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी महेंद्रसिंह शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा :

जळगावमध्ये तुफान पावसानं शेतकरी दाम्पत्य बैलगाडीसह पुरात वाहून गेलं, बैलांचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता

राज्यात फलोत्पादनवाढीसाठी दिलेल्या शरद पवारांच्या सूचनांवर अंमलबजावणी करणार : अजित पवार

ई-नाम प्लॉटफॉर्मला 1 हजार बाजार समित्या जोडणार, 1.73 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी , नरेंद्र तोमर यांची माहिती

व्हिडीओ पाहा :

Big loss of guava farmer Sangli due to lockdown and natural calamities

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.