AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना 10 मिनिटांची भेट, ना व्यथा ऐकायला वेळ, ना आधार द्यायला’

ऑगस्टमधील पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची दुसऱ्यांदा पाहणी करण्यासाठी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांची केवळ 10 मिनिटं भेट घेतली.

'केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांना 10 मिनिटांची भेट, ना व्यथा ऐकायला वेळ, ना आधार द्यायला'
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 24, 2020 | 8:54 PM
Share

गडचिरोली : ऑगस्टमधील पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची दुसऱ्यांदा पाहणी करण्यासाठी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांची केवळ 10 मिनिटं भेट घेतली. यावेळी ना मोबदला मिळाला ना, पथकाने व्यथा ऐकल्या. प्रश्न उपस्थित केल्यावर पथकाकडून नवे नियम सांगत काढता पाय घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. गडचिरोली पाहणीत वडसा तालुक्यातील सावंगी, कोंढाळा या गावांमध्ये तर आरमोरी तालुक्यातील देऊळगाव या गावात पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली (Central Government committee visit Farmer of Gadchiroli for only 10 minutes).

यावेळी पथकातील सदस्यांनी पूरपरिस्थितीनंतर शासनाकडून मदत मिळाली का? नुकसान झालेल्या क्षेत्रात आता काय आहे? किती उत्पन्न मिळाले? याबाबत त्यांनी चौकशी केली. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालाच नाही. शेतकऱ्यांनी मोबदल्याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नवीन नियम सांगून केंद्रीय पथकाने तेथून काढता पाय घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

पुराने बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकात सहसचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल उपस्थित होते. सोबत विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम आणि तहसिलदार देसाईगंज आणि आरमोरी यावेळी उपस्थित होते. यानंतर त्यांनी जिल्हास्तरावर संबंधित विभागाच्या प्रमुखांशी चर्चा केली.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालाच नाही. शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्यास नवीन नियम सांगून केंद्रीय पथक निघून गेलं. केंद्रीय पथकाने प्रश्न विचारल्यानंतर त्याला नियम सांगत उत्तर दिलं, पण आमच्या मदतीबद्दल काहीही सांगितलं नाही. अनेक शेतकरी सकाळपासून या पथकाची वाट बघत होते. हे पथक आपल्या व्यथा आणि अडचणी समजून घेऊन मदत मिळवून देईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, हे पथक केवळ 10 मिनिटाची भेट घेत निघून गेले. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथाही ऐकल्या नाहीत, असाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

राज्य शासनाकडून काय मदत झाली?

जिल्ह्यात पुरामुळे 4 तालुक्यांमधील एकूण 219 गावं प्रभावित झाली होती. यातील 24 हजार 676 शेतकऱ्यांचे 18 हजार 263 हेक्टर धान, 3 हजार 929 कापूस असे एकूण 22 हजार 193 हेक्टर शेतीचं नुकसान झालं होतं. या सर्व क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडून 237 कोटी रूपये नुकसान भरपाई मंजूर झाली. त्यातील 99.49 टक्के निधी वितरीतही करण्यात आला आहे. तसेच 48 तासांपेक्षा जास्त काळ पूराच्या पाण्यात घर असलेल्या 645 कुटुंबांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रूपयांप्रमाणे 64.6 लाख रूपये वाटप करण्यात आले होते.

दुर्दैवाने गडचिरोलीत पुरामुळे 1 मृत्यू झाला होता. मृताच्या कुटुंबीयांना 4 लाख रूपयांची मदत देण्यात आली. काही ठिकाणी जनावरे इतर पशू दगावले. त्यासाठी 54 हजार मदत दिली गेली. घरांमध्ये पूर्ण नूकसान झालेली 6 घरे, काही प्रमाणात नूकसान झालेली 72 घरे आणि पूर्ण नूकसान झालेल्या 10 गोठ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या सर्व नुकसानाची 9.73 लाख रुपये भरपाई दिली. केंद्रीय पथकाने या मदतीचाही आढावा घेतला.

संबंधित बातम्या :

रडू नका, खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत; मुख्यमंत्र्यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

‘माझे लेकरु मला परत द्या’ आईच्या हंबरड्यानंतर प्रवीण दरेकरांनाही अश्रू अनावर

Central Government committee visit Farmer of Gadchiroli for only 10 minutes

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ