AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात तुरळक पाणी साचले

गोंदिया जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात तुरळक पाणी साचले
rain update Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2023 | 11:21 AM
Share

मुंबई : मुंबईत (maharashtra mumabai rain update) मागच्या आठ दिवसांपासून हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी सुरु आहेत. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार (heavy rain) पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सखल भागात पाणी सुध्दा साजले आहे. वसई विरार आणि नालासोपारा भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या परिसरात जिथं सकळ भाग आहे, अशा ठिकाणी पाणी साचलं आहे. तिथली वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. त्याचबरोबर पावसाचा लोकल ट्रेन वर कोणताही परिणाम नसून विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरार (viral to churchgate local train) लोकल सेवा सुरळीत चालू आहे.

वाशिम जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या दमदार पावसानंतर आता पेरण्यांना वेग आला आहे. बळीराजा पारंपारिक तिफणीसह ट्रॅक्टरने पेरणी करताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यात शेतकरी सगळ्यात जास्त सोयाबीनचे उत्पादन घेतात. सोयाबीनच्या पेरणीसाठी 15 ते 20 दिवस उशीर झाला आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई करावी लागली आहे.

नांदेडमध्ये पावसाच्या हजेरीनंतर आता शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. उशिराने आलेल्या पावसाने आता शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केल्याचे चित्र शिवारात पाहायला मिळतंय.

धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे पेरण्यांना वेग मिळणार आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर ते पेरणे खोळंबल्या होत्या. जुलै महिना आला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्याची चिंता दूर झाली आहे. 24 तासांमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे लागवड झालेल्या पिकांना जीवदान मिळालेले आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.