AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्याला निकषांपेक्षा अधिकची नुकसानभरपाई, पहा तुमच्या जिल्ह्याला कितीची मदत?

एनडीआरएफ च्या निकषानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले होते तर नुकसानभरपाईसाठी 2585 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी ढळते माप देण्यात आले आहे. 3700 कोटी रुपयांची मदत मराठवाड्याच्या वाटेला येणार आहे.

मराठवाड्याला निकषांपेक्षा अधिकची नुकसानभरपाई, पहा तुमच्या जिल्ह्याला कितीची मदत?
सोयाबीनचं नुकसान
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 16, 2021 | 11:29 AM
Share

लातूर : अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्याला बसलेला होता. त्याअनुशंगाने पाहणी, पंचनामे, लोकप्रतिनिधी थेट बांधावर देखील आले. मात्र, (State Government) राज्य सरकारच्या मदतीनंतर खरचं मराठवाड्यातील पीकाचे नुकसान झाले याचा अंदाज येत आहे. एनडीआरएफ (NDRF Norms) च्या निकषानुसार 33 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले होते तर नुकसानभरपाईसाठी 2585 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल तयार करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी ढळते माप देण्यात आले आहे. 3700 कोटी रुपयांची मदत मराठवाड्याच्या वाटेला येणार आहे.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन, उडीद ही पीके तर पाण्यातच होती पण शेत जमिनीही खरडून गेल्या होत्या. त्यामुळे नुकसानीची दाहकता सर्वानाच आली होती पण प्रत्यक्षात किती मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. एनडीआपएफ च्या निकषाप्रमाणे 2585 कोटी रुपयांची गरज असल्याचे जाहीर करण्यात आले असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. यामध्ये मराठवाड्याच्या वाटेला 3700 कोटी म्हणजेच एनडीआरएफ च्या निकषांच्या तुलनेत 975 कोटी हे अधिकचे मिळालेले आहेत. त्यामुळे आता या निधीचे वितरण कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.

राज्य सरकारच्या मदतीचं स्वरुप नेमकं कसं असेल?

जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल

बीडला सर्वाधिक नुकसानभरपाई

औरंगाबाद विभागासाठी 3700 कोटींची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अधिकचे नुकसान हे झाले होते. मात्र, बीड जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 636 कोटींची मदत मिळणार आहे. पावसामुळे पीकांचे तर नुकसान झालेच होते पण शेतजमिनीही खरडून गेल्या होत्या. आता जिरायत, बागायत आणि फळपिकांसाठी वेगवेगळे निकष लावण्यात आलेले आहेत. मात्र, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी बीडला सर्वाधिक मदत मिळालेली आहे.

क्षेत्रानिहाय असे झाले आहे नुकसान

मराठवाड्यातील जिरायत क्षेत्रावरील 35 लाख 34 हजार हेक्टरावरील पीकांचे नुकसान झाले आहे तर याकरिता 3530 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. बागायत क्षेत्राचे 68 हजार 391 हेक्टरावरील नुकसान झाले असून त्यापोटी 102 कोटी रुपये मिळणार आहेत तर फळपिकांचे 50 हजार 109 हेक्टरावरील नुकसान झाले असून त्याकरिता 125 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (Compensation: Rs. 3700 crore assistance to Marathwada, highest assistance in Beed district, )

संबंधिच बातम्या :

तयारी रब्बी हंगामाची : ज्वारीच्या उत्पादनाची वाढ अन् काय दुहेरी फायदा ?

गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा

‘अन्नत्याग’ नंतर आता लातूरात भाजपच्याच आमदाराची शेतकऱ्यांसाठी ‘पदयात्रा’

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर