AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसानंतर कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना ?

खरीपातील पीकांना पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे. सोयाबीनची काढणी आणि कापसाची तोडणी ही कामे अजूनही रखडलेली आहेत. यातच वातावरणातील बदलामुळे कापसावर रोगराईचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आगोदर पावसामुळे पीकाचे नुकसान झाले आहे तर आता किडीमुळे. त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून आता फवारणीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

पावसानंतर कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना ?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 1:26 PM
Share

लातूर : खरीपातील (Kharif) पीकांना पावसामुळे मोठा फटका बसलेला आहे. सोयाबीनची काढणी आणि कापसाची तोडणी ही कामे अजूनही रखडलेली आहेत. यातच वातावरणातील बदलामुळे कापसावर रोगराईचा प्रादुर्भाव पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आगोदर पावसामुळे पीकाचे नुकसान झाले आहे तर आता किडीमुळे. (Cotton) त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून आता फवारणीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

खरीप हंगामात लागवड केलेल्या प्रमुख पिकांपैकी कापूस एक आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्याची सर्वाधिक कापसाची लागवड केली जाते. मात्र, यामध्ये गुलाबी आळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या अनेक भागात कापसाचे पीक धोक्यात आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असून किडीचा प्रादुर्भाव असाच राहिला तर केवळ 40 ते 50 टक्केच पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना वेळेत करणे गरजेचे झाले आहे. तरच अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पांढरी माशी

या माश्या पानांच्या खालच्या पृष्ठभागावर राहतात आणि वनस्पतींना कमकुवत करण्यासाठी रस शोषून घेतात. या माश्यांनी वनस्पतींवर चिकट पदार्थ सोडले तर बुरशी तयार होते. हे टाळण्यासाठी पीक कवच अनुसरण करा आणि एकरी 2-3 सापळे तयार करा. जर पिकात पांढरा माशीहल्ला दिसला तर 200 लिटर पाण्यात 75% डब्ल्यूयूपी 800 ग्रॅम, थाइमथोक्झम 40 ग्रॅम तर इमिडाक्लोरपिड 40 मिली हे 200 लिटर पाण्यात मिसळून एक एकरीप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.

अमेरिकन आळी

ही आळी पाने पोखरणारी आळी आहे. कापसाच्या पानावरच ही प्रादुर्भाव करीत असल्याने वाढ तर खुंटतेच पण उत्पादनावर देखील परिणाम होतो. ही एकटी अळी 30-40 कापसाचे नुकसान करू शकते. हे हल्ले तपासण्यासाठी लाइट कार्ड किंवा फेरोमोन कार्ड वापर करता येतो. कापूस लागवडीपूर्वी तणनाशकाची फवारणी गरजेची आहे. शिवाय दरवर्षी केवळ कापसाचीच लागवड न करता पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा वापर हा कमी करावा.

गुलाबी बोंड अळी

हे किटक वनस्पतींचे खोड, फांद्या, पानांचा रस शोषून वनस्पतींना कमकुवत करते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडुनिंबाच्या तेलाची फवारणी करून या किडीपासून सुटका करून घेऊ शकता. त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर प्रोफेनोफोस 500 मिली हे 150 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

माहू कीटक

हा कीटक हिरवा किंवा फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो. पानांच्या खालच्या पृष्ठभागाचा रस शोषून वनस्पतींना कमकुवत करते. त्यामुळे पिकाचे खूप नुकसान होते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी 3 मिली आयमिडाक्लोपीडी जमिनीत घालून या किडीपासून सुटका करून घेण्यासाठी फवारणी केली जाते. (Cotton yellow pest outbreak, likely to reduce production )

संबंधित बातम्या :

रब्बी हंगामाच्या तोंडावर खतांची कृत्रिम टंचाई ; शेतकऱ्यांच्या समस्या कायम

साखरेच्या प्रत्येक पोत्यातून होणार आता सरकारी रकमेची वसुली, कारखान्यांकडे कोट्यावधींची थकबाकी

कृषी विद्यापीठाकडील अतिरिक्त जमीन शेतकऱ्यांना परत करा: प्रहार जनशक्ती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.