AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीने नाही तर वन्यप्राण्यांना त्रासून सोयाबीनवर फिरवला नांगर

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान कसे झाले आहे याचा प्रत्यय दिवसागणिक येत आहे. मात्र, निलंगा तालुक्यातही सोयाबीनचे नुकसान झाले आहे पण ते अधिकच्या पावसाने नव्हे तर वण्यप्राण्यांमुळे...हो सातत्याने होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी कुमार राठोड यांनी सोयाबीन या पिकावर थेट नांगर फिरवला आहे.

अतिवृष्टीने नाही तर वन्यप्राण्यांना त्रासून सोयाबीनवर फिरवला नांगर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 15, 2021 | 5:30 PM
Share

लातुर : मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान कसे झाले आहे याचा प्रत्यय दिवसागणिक येत आहे. मात्र, निलंगा तालुक्यातही सोयाबीनचे नुकसान झाले आहे पण ते अधिकच्या पावसाने नव्हे तर वण्यप्राण्यांमुळे…हो सातत्याने होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी कुमार राठोड यांनी सोयाबीन या पिकावर थेट नांगर फिरवला आहे. राठोड यांच्या बांधालगतच वन विभागाचे क्षेत्र आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सातत्याने येथे वर्दळीमुळे खरिपातील सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कुमार राठोड यांना केळगाव शिवारात 2 एक्कर जमिन आहे. खरिपात हंगामात त्यांनी या क्षेत्रावर सोयाबीन, तूर या पिकांचा पेरा केला होता. सोयाबीन पिक जोमात आले होते. मात्र, पावसाबरोबरच लगतच्या वन क्षेत्रामुळे येथे वन्यप्रकण्यांचा मुक्त संचार असतो. अनेक वेळा तक्रार करुनही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. पिक जोमात असतानाच हरणांनी पिक फस्त केल्याने यामध्ये उत्पादनाची अपेक्षकाच शेतकरी रोठोड यांना राहिलेली नाही.

मध्यंतरी याच सर्वे नंबर 88 मधील तूरही त्यांनी अशाचप्रकारे नांगरून टाकली होती. एकीकडे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान होत आहे तर निलंगा येथे मात्र, वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

खरिप-रब्बी हंगामातील पिकाचे नुकसानच

खरिप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकाचे नुकसान हे या वन्यप्राण्यांकडून केले जात आहे. याबाबत राठोड यांनी तक्रारही नोंद केली मात्र, वनविभागाकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. दरवर्षी राठोड यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शासन दरबारी मदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पावसाने लातुर जिल्ह्यात झालेले नुकसान

लातुर तालुक्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याहे मांजरा नदी काठच्या परीसरात ऊसाची लागवड वाढली होती. गेल्या चार दिवसांपासून याच पट्ट्यात अधिकचा पाऊस झाल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोयाबीनचे केवळ 5 हेक्टर नुकसान दाखिवल्याहे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळीवणे गरजेचे

जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनसह बागायत क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती ठरवून दिलेल्या अॅपद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच नुकसानीची मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी ऊस उत्पादकाचे नुकसान

गतवर्षी चांगला दर असतानाही केवळ ऊस कारखान्यावर घालण्याच्या प्रसंगी वादळी वारे सुटल्याने ऊसाची पडझड झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊसाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवले. यंदाही ऐन वेळीच पावसाची अवकृपा झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. Crop breakdown after getting fed up with wild animal trouble

संबंधित इतर बातम्या :

सण-सुदीमुळे फुलांचा बाजार ‘फुलला’, व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य

हातचं खरिप गेलं, जगा कस? नांदेडच्या राऊबाईंचा भाविनक व्हिडीओ व्हायरल

ई-पीक पाहणीच्या माध्यमातून 30 लाख शेतकऱ्यांनी केली पीक पेऱ्याची नोंदणी

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?