AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : नुकसानीचा पाऊस, वीज कोसळून गायी-म्हशी दगावल्या, फळबागाही आडव्या

लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये निलंगा आणि औसा तालुक्यातच पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र, देवणी ,शिरूर-अनंतपाळ ,रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच झालेल्या पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

Latur : नुकसानीचा पाऊस, वीज कोसळून गायी-म्हशी दगावल्या, फळबागाही आडव्या
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 12:12 PM
Share

लातूर : आतापर्यंत (Unseasonable Rain) अवकाळी पावसाची अवकृपा होती. त्याची जागा आता मान्सूनपूर्व पावसाने घेतली आहे. (Latur District) लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीसाठी फायदेशीर असला तरी मात्र, अचानक झालेल्या (Rain) पावसामुळे फळबागा ह्या आडव्या झाल्या आहेत. तर वीज कोसळल्याने एक गाय आणि सहा म्हशी दगावल्या आहेत. यंदा अपेक्षेपेक्षा आगोदरच पावसाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांची उन्हाळी पिके अजून शेतामध्येच आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचा धांदल उडाली असली तरी वीज कोसळल्याने जिल्ह्यात 7 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यातच पावसाने हजेरी लावली आहे. कडाक्याच्य़ा उन्हानंतर पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्वकाही बदलून गेले आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन

लातूर जिल्ह्यात सुरवातीच्या दोन दिवसांमध्ये निलंगा आणि औसा तालुक्यातच पावसाने हजेरी लावली होती. आता मात्र, देवणी ,शिरूर-अनंतपाळ ,रेणापूर आणि अहमदपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच झालेल्या पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. किनगाव ते रेणापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे कोलमडून रस्त्यावर पडली आहेत .

वीज कोसळल्याने कडब्याच्या गंजीला आग

रेणापूर तालुक्यातील अनेक गाव शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यातील फावडेवाडी येथील चार जनावरांच्या गोठ्यांना आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे जनावरांसाठी साठवणूक केलेल्या चाऱ्यावर देखील वीज कोसळल्याने चारा जळून खाक झाला आहे. याशिवाय पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची औजारेही जळून खाक झाली आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जनावरांच्या गोठ्याला आग

दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. शुक्रवारी सायंकाळी तर वादळी वाऱ्यासह नुकसानीचाच पाऊस झाला आहे. यामुळे शेतीकामात अडथळे निर्माण होऊन अनेक प्रश्न उपस्थित राहणार आहेत. रेणापूर तालुक्यातील 1 गायी आणि 6 म्हशी दगावल्या आहेत. पावसाची सुरवात ही दिलासादायक असली तरी वादळी वाऱ्यामुळे हा पाऊस नुकसानीचा ठरत आहे. चारापिके आणि फळबागांचे मोठे नुकसान होत आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.