AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर

किडीमुळे उत्पादनात घट होऊ शकते मात्र, डाळिबांवरील खोडकिडीमुळे थेट बागाच उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान सध्या होत असून ज्या भागात अधिकचे क्षेत्र आहे त्याच भागाच या किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेष म्हणजे यावर अद्यापही तोडगा काढण्यास डाळिंब संशोधन विभागाला यश आलेले नाही.

Pomegranate : खोडकिडीचा परिणाम थेट डाळिंब निर्यातीवर, किडीमुळे उत्पादनात घट नाही तर बागाच नष्ट, वाचा सविस्तर
वातावरणातील बदलामुळे डाळिंब बागेवर परिणाम झााल आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 04, 2022 | 10:59 AM
Share

सोलापूर : किडीमुळे उत्पादनात घट होऊ शकते मात्र, डाळिबांवरील खोडकिडीमुळे थेट बागाच उध्वस्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान सध्या होत असून ज्या भागात अधिकचे क्षेत्र आहे त्याच भागाच या (Pest Outbreak) किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेष म्हणजे यावर अद्यापही तोडगा काढण्यास (Pomegranate Research) डाळिंब संशोधन विभागाला यश आलेले नाही. त्यामुळे खोडकि़डीचा प्रादुर्भाव झाला की, एकतर डाळिंबाचे झाड हे जागेवर जळून तरी जाते अन्यथा शेतकऱ्यांना तोडून बांधावर टाकावे लागते. यामुळे यंदाच्या डाळिंब निर्यातीवर खोडकिडीचा मोठा प्रभाव जाणवला आहे. गेल्या दोन महिन्यापासून (Pomegranate Export) डाळिंब निर्यातीची प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत केवळ 500 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिकची घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका तर बसलेला आहेच पण ज्या भागात अधिकचे उत्पादन घेतले जाते तिथे डाळिंबाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र

डाळिंब बागांसाठी कोरडवाहू क्षेत्र अधिक चांगले असते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि इतर तालुक्यांमध्ये डाळिंबाचे क्षेत्र हे वाढलेले आहे. शिवाय याकरिता पाणीही कमी लागते. देशात तब्बल 2 लाख 80 हजार हेक्टरावर डाळिंबाच्या बागा आहेत. पैकी 1 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र केवळ महाराष्ट्रात आहे. यानंतर मध्यप्रदेश, राज्यस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांध्येही डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, वातावरणातील बदल आणि खोडकिडीसारख्या रोगाचा वाढता प्रादुर्भाव थेट डाळिंबाच्या अस्तित्वापर्यंतचा विषय बनला आहे.

खोडकिडीमुळे नेमके काय होते?

डाळिंबाच्या बागा बहराक आल्या की या खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शेतकऱ्यांना बागेबाबत कोणता निर्णयही घेता येत नाही. मात्र, खोडकिडीमुळे एकतर डाळिंबाचे झाड हे जागेवरच नष्ट होते कींवा ते वाळल्यामुळे शेतकऱ्यांना काढून बांधावर फेकावे लागते. शिवाय असे केले नाही तर त्याचा प्रादुर्भाव इतर पिकांना होता. आणि अवघ्या काही दिवसांमध्येच संपूर्ण बागच नष्ट होते. गेल्या दोन वर्षापासून डाळिंबाला योग्य मार्केट नव्हते आता मागणी वाढली आहे तर उत्पादन घटले आहे.

कशामुळे बदलले चित्र?

पोषक वातावरण आणि दर्जेदार उत्पादनामुळे अल्पावधीच सांगोल्याची डाळिंबे ही सातासमुद्रापार गेली होती. शिवाय येथील अत्यल्प पर्जन्यमान, उष्ण हवामान व डाळिंबासाठी पोषक वातावरण यामुळे तब्बल 35 हजार हेक्टरावर डाळिंबाच्या बागा बहरत होत्या. मात्र, वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका डाळिंब बागांना बसलेला आहे. डाळिंबावर तेल्या रोग त्यानंतर मर आणि आता नव्यानेच बोरर या खोडकिडीचे आक्रमण यामुळे बागा जोपासणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. खोडकिडीने संपूर्ण झाडच वाळून जात आहे तर तेल्या रोगावर अद्यापही योग्य औषध उपलब्ध झालेले नाही. हीच कारणे आहेत डाळिंब बागेच्या तोडणीची. त्यामुळे शेतकरी नव्या पर्यायाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातमी :

Banana : हमी पीक झाले बेभरवश्याचे, केळीवर कीडीचा प्रादुर्भाव अन् विम्यासाठी शेतकऱ्यांची परवड

काळ्या मिरचीची गोष्टच न्यारी लागवड सोपी अन् उत्पादन भारी, तीन महिन्यांमध्ये शेतकरी मालामाल

POCRA : ‘पोकरा’चे रखडलेले अनुदान थेट खात्यामध्ये, पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?