Summer Crop : सोयाबीन बहरलं पण अंतिम टप्प्यात गणित बिघडलं, मराठवाड्यातच नेमक असं काय घडलं?

पोषक वातावरणामुळे पीक बहरलेही. खरिपात झालेले नुकसान यंदा उन्हाळी सोयाबीनमधून निघेल असा शेतकऱ्यांना विश्वास असतानाच आता सोयाबीन धोक्यात आले आहे. कारण तापमानात वाढ झाली तर पाणी पातळी झपाट्याने खलावली आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. आता थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे.

Summer Crop : सोयाबीन बहरलं पण अंतिम टप्प्यात गणित बिघडलं, मराठवाड्यातच नेमक असं काय घडलं?
पाणी पातळी घटल्याने उन्हाळी हंगमातील पीके धोक्यात आहेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 11:18 AM

नांदेड : याला म्हणतात निसर्गाचा लहरीपणा…उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये (Unseasonable Rain) अवकाळी पावसामुळे रबी पिकांसह फळबागांचे नुकासन होत आहे. शेतामध्ये पाणी साचून राहत आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात उन्हाच्या झळा वाढल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या (Summer Soybean) उन्हाळी सोयाबीनने माना टाकल्या आहेत. (Marathwada) मराठवाड्यात पावसाची आवश्यकता असताना सूर्य आग ओकत आहे तर उर्वरीत भागात पावसामुळेच पिकांसह फळबागांचे नुकसान सुरु आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकरी गेल्या वर्षभरापासून करीत आहे. उत्पादनात वाढ होईल असा अवकाळी कधी बरसलाच नाही. शेतकऱ्यांसाठी तो नुकसानीचाच ठरत आहे. मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्ये यंदा उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा झाला आहे. पण वाढत्या उन्हामुळे आता उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.

नेमका परिणाम काय ?

सोयाबीन हे पावसाळी पीक आहे. त्यामुळे या दरम्यानचे वातावरण आणि पावसामुळे याची वाढ कमी कालावधीत होते. यंदा पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा पेरा केला. शिवाय पोषक वातावरणामुळे पीक बहरलेही. खरिपात झालेले नुकसान यंदा उन्हाळी सोयाबीनमधून निघेल असा शेतकऱ्यांना विश्वास असतानाच आता सोयाबीन धोक्यात आले आहे. कारण तापमानात वाढ झाली तर पाणी पातळी झपाट्याने खलावली आहे. वेळेत पाणी मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. आता थेट उत्पादनावरच परिणाम होणार आहे.

प्रकल्पातील पाण्याचेही वेळाप्रत्रक कोलमडले

यंदा कधी नव्हे ते शेतीसाठी प्रकल्पातन असलेल्या राखीव पाण्याचा फायदा शेती पिकांना झाला होता. त्यामुळे पीके बहरली असून आता अंतिम टप्प्यात पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. त्याचाही फटका उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादनावर झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनबाबत जो अंदाज बांधला होता त्यानुसार उत्पादन पदरी पडेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

उत्पादन घटणार

आतापर्यंत उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे उत्पादन वाढणार असे चित्र होते. त्यामुळे खरिपात जे नुकसान झाले ते भरुन काढण्यासाठी या पिकाची मदत होईळ असे चित्र होते. मात्र, शेंगा पोसण्याच्या अवस्थेतच पाणी कमी पडू लागल्याने उत्पादनात घट होणार हे निश्चित आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.पण शेतकरी काहीही करुन सोयाबीन जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्तर महाराष्ट्राप्रमाणे अवकाळी मराठवाड्यात बरसली तर सोयाबीनसाठी नवसंजीवनीच ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.