AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane : IPL सुरू होण्यापूर्वीच KKR ला झटका ? अजिंक्य रहाणेच्या पोस्टने खळबळ

2025 च्या सीझनमध्येच कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची नियुक्ती करण्यात आली होती. चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यर संघाबाहेर पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तेव्हा रहाणेच्या नेतृत्वाखाली, केकेआर प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही.

Ajinkya Rahane : IPL सुरू होण्यापूर्वीच KKR ला झटका ? अजिंक्य रहाणेच्या पोस्टने खळबळ
अजिंक्य रहाणे
| Updated on: Mar 13, 2026 | 1:20 PM
Share

येत्या काही दिवसांतच आयपीएलचा 19 वा सीझन सुरू होणार असून पुढील 2 महिने 10 संघांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. आयपीएल 2026 च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सगळ्याच टीम उत्सुक आहेत. मात्र आयपीएलचा हा सीझन सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक टीममध्ये काही ना काही बदल केले आहेत, मग ते स्क्वॉडमधले असोत किंवा कोचिंग स्टाफमधले. तर राजस्थना रॉयल्सने त्यांचा कर्णधारही बदलला आहे. मात्र याच दरम्यान कोलकाता नाईट रायजर्स अर्थात केकेआर टीमच्या कर्णधारपदात बदल होण्याच्याही अनेक अटकळी व्यक्त होत असून त्याबद्दल अनेक अफवा सतत उडत असतात. आता आयपीएलची स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवडे आधीच अचानक KKR चा कॅप्टन अजिकंय रहाणे हा पदावरून हटल्याचा दावा करण्यात येत आहे. आणि त्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती एक सोशल मीडिया पोस्ट, ज्यावर रहाणेने कॅप्टन्सी सोडल्याची घोषणा केली आहे.

रहाणेचा राजीनामा व्हायरल

‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका अकाउंटवरून अजिंक्य रहाणे याच्या नावाने एक निवेदन पोस्ट करण्यात आलं आहे. ते त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेतलेलं दिसतंय. “कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणे आणि सामने जिंकणे हा सन्मान आहे. नवीन हंगाम जवळ येत असताना, नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी कर्णधारपद न सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.” असं त्यात म्हटलं आहे.

त्या निवेदनासोबत 12 मार्च 2026 ही तारीखही लिहीण्यात आली असून यामुळे सोशल मीडियावरील युजर्ससकट सगळेच हैराण झाले. केकेआरच्या कॅप्टन्सीमध्ये खरंच बदल झाला आहे का? रहाणेने राजीनामा दिलाय  ? हे निवेदन खरं आहे का?  असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.  पण हे अजिबात खरं नाहीये.  रहाणे किंवा केकेआरकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अजिंक्य रहाणेच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची तपासणी केल्यावर तेव्हा सत्य समोर आलं. रहाणेने कॅप्टन्सी सोडलेली नाही आणि अशी कोणतीही घोषणा देखील त्याने केलेली नाही.

व्हायरल पोस्टचं सत्य काय ?

म्हणजेच रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याबद्दल केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. या विधानामागची खरी गोष्ट म्हणजे, रहाणेने गेल्या वर्षीही अशीच घोषणा केली होती, परंतु ती आयपीएल कर्णधारपदाचा राजीनामा देण्याबाबत नवह्ती तर स्थानिक क्रिकेटमधील मुंबई संघाच राजीनामा देण्याबाबतची ती घोषणा होती. रहाणेच्या पोस्टची भाषा आणि आजच्या या बनावट पोस्टमधील भाषा सारखीच आहे. मात्र त्याचं मूळ विधान जे होते, तेच फक्त एडिट केलंय. आणि मुंबईच नाव बदलून तिथे कोलकाता नाईट रायडर्सचं नाव टाकलं आहे.

KKR च्या कर्णधारपदी रहाणे कायम

2024 चा विजेता कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्जसोबत मेगा लिलावात सहभागी झाला, त्यानंतर अजिंक्य रहाणेला गेल्या हंगामात केकेआर संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्रे रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या केकेआरला गेल्या हंगामात फार यश मिळाले नाही. हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. तरीही, हंगामातदेखील रहाणे हाच केकेआरचं नेतृत्व करणार आहे. केकेआरचा पहिला सामना 29 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....