AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Loan : राज्य सरकारच्या आदेशानंतरही पीककर्जाचे वाटप कासवगतीने, नेमकी चूक कोणाची ?

खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले तर त्याचा उपयोग हा खरिपातील कामांना होणार आहे. त्यानुसार 1 मे पासून कर्ज वाटपास सुरवात झाली आहे. कर्ज वाटपाबाबत बॅंकांची उदासिनता ही कायम असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद विभागातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 6.5 टक्केच पीककर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये सर्वात कमी टक्केवारी ही परभणी जिल्ह्याची आहे.

Crop Loan : राज्य सरकारच्या आदेशानंतरही पीककर्जाचे वाटप कासवगतीने, नेमकी चूक कोणाची ?
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 13, 2022 | 6:05 AM
Share

औरंगाबाद : शेतकऱ्यांना वेळेक पीक कर्ज मिळावे म्हणून (State Government) राज्य सरकारने धोरणांमध्ये बदल केला. मात्र, राज्य सरकारचा ज्या गोष्टीसाठी आटापिटा सुरु आहे ती पूर्ण होईल का नाही याबाबत संभ्रम अवस्था निर्माण होत आहे. आणि यासाठी जबाबदार ठरत आहे ती प्रशासकीय यंत्रणा. (Kharif Season) खरीप हंगामाच्या पूर्वीच शेतकऱ्यांना (Crop Loan) पीककर्ज मिळाले तर त्या पैशाचा योग्य वापर होतो. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होताच मे महिन्याच्या सुरवातीपासूनच पीककर्ज शेतकऱ्यांना देण्याचे आदेश कृषी विभागासह संबंधित बॅंकाना देण्यात आले आहेत. मात्र, औरंगाबाद विभागात केवळ 6.5 टक्केच खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे सरकारचा उद्देश आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणार का हे पहावे लागणार आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये कमी वितरण

खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले तर त्याचा उपयोग हा खरिपातील कामांना होणार आहे. त्यानुसार 1 मे पासून कर्ज वाटपास सुरवात झाली आहे. कर्ज वाटपाबाबत बॅंकांची उदासिनता ही कायम असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद विभागातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 6.5 टक्केच पीककर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये सर्वात कमी टक्केवारी ही परभणी जिल्ह्याची आहे. परभणी जिल्ह्यासाठी 105 कोटी 25 लाख 81 हजाराचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ 21 कोटी 98 हजाराचे वितरण झाले आहे. अशाच पध्दतीने कर्ज वाटप कायम राहिले तर उद्दीष्ट साध्य होणार की नाही याबाबक शंकाच आहे.

राज्य सरकारचा धोरणामध्ये बदल

दरवर्षी पीककर्जा वाटप उद्दीष्टापेक्षा कमीच असते. त्यामुळे अर्थसंकल्पात नमूद केलेल्या योजनांची अंमलबजावणी लागलीच करण्याचे आदेश राज्य सरकारने केली आहे. यापूर्वी वर्षभर योजनांच्या लाभांकडे दुर्लक्ष होत असत आणि अंतिम टप्प्यातच उद्दीष्टपूर्तीचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे ठरवून दिलेला निधीही खर्ची होत नव्हता. त्यामुळे मे महिन्यापासूनच योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने कृषी विभाग आणि राष्ट्रीयकृत बॅंकांना दिले आहेत. मात्र, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पीक कर्जाची प्रक्रिया अन् आवश्यक कागदपत्रे

पीककर्जाचे वाटप सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून केले जाणार आहे. याकरिता बॅंकेचा खातेदार असणे गरजेचे आहे तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीनेही अर्ज करु शकरणार आहेत. याशिवाय बॅंकांना काही गावेही दत्तक दिली आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित बॅंकावर असते. कर्जासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, व्हॅल्युवेशन, सर्च रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेली इतर कागदपत्रे ही बॅंकेकडे जमा करावी लागणार आहेत.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ