AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crop Loan : राज्य सरकारच्या आदेशानंतरही पीककर्जाचे वाटप कासवगतीने, नेमकी चूक कोणाची ?

खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले तर त्याचा उपयोग हा खरिपातील कामांना होणार आहे. त्यानुसार 1 मे पासून कर्ज वाटपास सुरवात झाली आहे. कर्ज वाटपाबाबत बॅंकांची उदासिनता ही कायम असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद विभागातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 6.5 टक्केच पीककर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये सर्वात कमी टक्केवारी ही परभणी जिल्ह्याची आहे.

Crop Loan : राज्य सरकारच्या आदेशानंतरही पीककर्जाचे वाटप कासवगतीने, नेमकी चूक कोणाची ?
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 13, 2022 | 6:05 AM
Share

औरंगाबाद : शेतकऱ्यांना वेळेक पीक कर्ज मिळावे म्हणून (State Government) राज्य सरकारने धोरणांमध्ये बदल केला. मात्र, राज्य सरकारचा ज्या गोष्टीसाठी आटापिटा सुरु आहे ती पूर्ण होईल का नाही याबाबत संभ्रम अवस्था निर्माण होत आहे. आणि यासाठी जबाबदार ठरत आहे ती प्रशासकीय यंत्रणा. (Kharif Season) खरीप हंगामाच्या पूर्वीच शेतकऱ्यांना (Crop Loan) पीककर्ज मिळाले तर त्या पैशाचा योग्य वापर होतो. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होताच मे महिन्याच्या सुरवातीपासूनच पीककर्ज शेतकऱ्यांना देण्याचे आदेश कृषी विभागासह संबंधित बॅंकाना देण्यात आले आहेत. मात्र, औरंगाबाद विभागात केवळ 6.5 टक्केच खरीप पीककर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे सरकारचा उद्देश आणि शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणार का हे पहावे लागणार आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये कमी वितरण

खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाले तर त्याचा उपयोग हा खरिपातील कामांना होणार आहे. त्यानुसार 1 मे पासून कर्ज वाटपास सुरवात झाली आहे. कर्ज वाटपाबाबत बॅंकांची उदासिनता ही कायम असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद विभागातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 6.5 टक्केच पीककर्ज वितरीत झाले आहे. यामध्ये सर्वात कमी टक्केवारी ही परभणी जिल्ह्याची आहे. परभणी जिल्ह्यासाठी 105 कोटी 25 लाख 81 हजाराचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ 21 कोटी 98 हजाराचे वितरण झाले आहे. अशाच पध्दतीने कर्ज वाटप कायम राहिले तर उद्दीष्ट साध्य होणार की नाही याबाबक शंकाच आहे.

राज्य सरकारचा धोरणामध्ये बदल

दरवर्षी पीककर्जा वाटप उद्दीष्टापेक्षा कमीच असते. त्यामुळे अर्थसंकल्पात नमूद केलेल्या योजनांची अंमलबजावणी लागलीच करण्याचे आदेश राज्य सरकारने केली आहे. यापूर्वी वर्षभर योजनांच्या लाभांकडे दुर्लक्ष होत असत आणि अंतिम टप्प्यातच उद्दीष्टपूर्तीचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे ठरवून दिलेला निधीही खर्ची होत नव्हता. त्यामुळे मे महिन्यापासूनच योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने कृषी विभाग आणि राष्ट्रीयकृत बॅंकांना दिले आहेत. मात्र, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पीक कर्जाची प्रक्रिया अन् आवश्यक कागदपत्रे

पीककर्जाचे वाटप सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून केले जाणार आहे. याकरिता बॅंकेचा खातेदार असणे गरजेचे आहे तर शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीनेही अर्ज करु शकरणार आहेत. याशिवाय बॅंकांना काही गावेही दत्तक दिली आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी ही संबंधित बॅंकावर असते. कर्जासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, 8 अ, शेतीचा नकाशा, फेरफार, व्हॅल्युवेशन, सर्च रिपोर्ट याशिवाय आवश्यक असल्यास वकिलांनी सुचवलेली इतर कागदपत्रे ही बॅंकेकडे जमा करावी लागणार आहेत.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.