AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujani Dam : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग अटोक्यात, नदी लगतच्या पिकांना जीवदान

उजनी धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने हे धरण 100 टक्के भरले होते. त्यामुळे 13 ऑगस्टपासून धरणातून तब्बल 61 हजार 600 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकाचे नुकसान सुरु झाले होते. यंदा जुलै पाठोपाठ ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांची स्थिती हीच आहे.

Ujani Dam : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग अटोक्यात, नदी लगतच्या पिकांना जीवदान
उजनी धरणImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 17, 2022 | 3:07 PM
Share

इंदापूर : उजणी धरणाच्या (Rise in water level) पाणीपातळीत वाढ झाल्याने गत आठवड्यात (Discharge of water) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. एवढेच नाहीतर पंढरपुरातील मंदिरेही पाण्याखाली गेली होती. दिवसेंदिवस धोका वाढत असताना मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग हा 10 हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे. अवघ्या 4 दिवसांमध्येच हा विसर्ग कमी करण्यात आल्याने नागरिकांना तर दिलासा मिळाला आहेच पण खरीप हंगामातील पिकांचे नुकसानही टळलेले आहे. (Dam Water) धरणातील पाणी पातळीचा अंदाज घेऊन हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे सोलापूर, पंढरपूर, माढा या तालुक्यातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

10 क्युसेकने विसर्ग कमी

उजनी धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने हे धरण 100 टक्के भरले होते. त्यामुळे 13 ऑगस्टपासून धरणातून तब्बल 61 हजार 600 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकाचे नुकसान सुरु झाले होते. यंदा जुलै पाठोपाठ ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांची स्थिती हीच आहे. पावसाची उसंत आणि धरणात पाण्याची होणारी आवक कमी असल्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत 51600 क्युसेक्स ने पाणी सोडण्यात येते आहे.

खरीप पिकांचे नुकसान टळले

हंगामाच्या सुरवातीपासून खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता. जुलैमध्ये अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर आता पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातील पाणी थेट शेत शिवारात घुसत आहे. पिकांमध्ये पाणी साचत असल्याने पिकांची वाढ तर खुंटली आहेच पण भविष्यात उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे. मात्र, मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नुकसान टळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

राज्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा

राज्यात जुलै आणि या महिन्यात चांगला पाऊस पडलाय, त्यामुळे राज्यातील धरणे 77.66 टक्के भरली आहेत. सरासरीच्या तुलनेत कोकण विभागातील धरणामध्ये 89 टक्के पाणीसाठा तर पुणे विभागातील धरणांत 83 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात धरणांमध्ये 71.47 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने, पिण्याच्या पाण्याची आणि काही भागात शेतीच्या पाण्याचीही चिंता मिटली आहे.

Follow Us
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला