AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’सारखा चित्रपट बनवणं सर्वांत मोठा मूर्खपणा..; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत

धर्मेंद्र यांचा शेवटचा 'इक्कीस' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सिमर भाटिया आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत.

'धुरंधर'सारखा चित्रपट बनवणं सर्वांत मोठा मूर्खपणा..; प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वक्तव्य चर्चेत
Dhurandhar and Ikkis movieImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2025 | 8:32 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान ‘इक्कीस’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी म्हटलं की ‘धुरंधर’ हा त्यांच्या प्रकारचा चित्रपट नाही. त्यांना आदित्य धरची शैली फॉलो करायची नाही आणि ‘धुरंधर’सारखा चित्रपट बनवणं हे मूर्खपणाचं काम असेल, असं देखील त्यांनी म्हटलंय. ‘द हिंदू’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान श्रीराम राघवन यांना विचारण्यात आलं की, ‘धुरंधर’ आणि त्यांचा भाऊ श्रीधर राघवन यांनी बनवलेल्या स्पाय चित्रपटांमध्ये काळ फरक आहे? त्यावर ते म्हणाले, “हा एक उत्तम चित्रपट आहे, ज्यामध्ये कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. परंतु तो आमच्या प्रकारचा चित्रपट नाही.

याविषयी श्रीराम राघवन पुढे म्हणाले, “आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपण एका वेगळ्या युगात राहतो. शॉन कॉनरी आणि रॉजर मूर अभिनित जेम्स बाँडचे सुरुवातीचे चित्रपट मनोरंजक होते. नंतर बाँडचे चित्रपट अधिक गंभीर झाले. ‘धुरंधर’ हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. तो बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करतोय आणि करायलाही हवा. पण तो एकमेव फॉरमॅट नाही. जर मी त्याचं अनुकरण केलं तर ते करणं सर्वात मूर्खपणाचं काम ठरेल. आदित्य धर आणि मी राष्ट्रीय पुरस्कारांचं व्यासपीठ शेअर केलं होतं, जेव्हा त्याने ‘उरी’ हा चित्रपट बनवला होता आणि मी ‘अंधाधून’ हा चित्रपट बनवला होता. त्याची संवेदनशीलता आणि कलात्मकता वेगळी आहे आणि मला त्याचे चित्रपट पहायला आवडतं. पण त्याच्यासारखे चित्रपट मी बनवणार नाही.”

श्रीराम राघवानी यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्याचाही अनुभव पुढे सांगितला. ते म्हणाले, “धरमजींसोबत अभिनयाचा कोणताही मागमूसच नव्हता. म्हणजे त्यांचं वर्तन, त्यांची शैली हे सर्व काही त्या पात्राचा भागच होते. ते कथेशी खोलवर जोडले गेले होते. पंजाबमधील त्यांचं घर सोडण्याचं दुःख त्यांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलं होतं. घरी परतण्याचा विचार त्यांच्यासाठी एक खोल वैयक्तिक अनुभव बनला. त्या पात्रात ते पूर्णपणे बुडाले होते. ते अक्षरशः ते पात्र जगत होते.

याविषयी ते पुढे म्हणाले, “त्यांना संवादांची सखोल समज होती आणि ते कमी शब्दांच्या वापराला अधिक महत्त्व देत होते. मी त्यांना संवाद लिहून दिले पण ते कसे म्हणायचे याबद्दल ते नेहमी माझा सल्ला विचारायचे. त्यात ते कधी स्वतःहून बदल करायचे आणि चित्रपटात मी त्यांनी सुचवलेल्या अनेक ओळी वापरल्यासुद्धा आहेत. आम्ही अनेकदा त्यांच्या कवितांवर चर्चा करायचो. मला त्यांच्या कविता प्रकाशित करायच्या होत्या, पण त्यांना घाई नव्हती. मी त्यांना चित्रपटासाठी त्यांची एक रचना वाचून दाखवण्याची विनंती केली आणि ते खूप सुंदर होतं.

Follow Us
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे  पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात कुठेही अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.  यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दारू अड्ड्यांना माल पुरवणारे, वाहतूक करणारे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांवरही पोलिसांचा फोकस असणार आहे.  पुण्यातील विविध भागांमध्ये पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून संशयित ठिकाणांची झडती घेतली जात आहे. अनेक अवैध अड्ड्यांची माहिती पोलिसांकडे जमा होत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिकांनीही अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...
धक्कादायक! तिकडे नोटीस आली, इकडे उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेच्या उमेदवाराने...संभाजीनगरात हाय वोल्टेज ड्रामा!