AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : चाढ्यावर मूठ ठेवताय, कृषितज्ञांचा सल्ला वाचा अन् निर्णय घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा आहे अशा शेतकऱ्यांनी पिक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलित करावे. तसेच उगवणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतर मशागतीची कामे करावी. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर केला तर पीक उगवणीपर्यंत शेतकऱ्यांना चिंता नाही.

Washim : चाढ्यावर मूठ ठेवताय, कृषितज्ञांचा सल्ला वाचा अन् निर्णय घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी
खरिपात सोयाबीनची पेरणी योग्य पध्दतीने केली तरच उत्पादनात वाढ होणार आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 28, 2022 | 10:15 AM
Share

वाशिम : (Maharashtra) राज्यात पावसाने हजेरी लावली असली तरी सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. असे असतानाही काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात (Re-Sowing) दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीच योग्य निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. बरेच शेतकरी वळीवाचा पाऊस पडल्यावर पेरणी आटोपून घेतात मात्र पावसाने दडी मारल्यास पिक सुकण्याचे किंबहुना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येते. त्यामुळे अलीकडे झालेल्या पावसाने जमिनीत 4 ते 6 इंच ओलावा असल्यासच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन (Agronomist) कृषितज्ञ डॉ.भरत गिते यांनी केले आहे. खरिपाबाबत यंदा शेतकऱ्यांची अडचण झाली असून सर्वकाही पावसावर अवलंबून राहणार आहे.

पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या असल्या तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा आहे अशा शेतकऱ्यांनी पिक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलित करावे. तसेच उगवणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतर मशागतीची कामे करावी. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर केला तर पीक उगवणीपर्यंत शेतकऱ्यांना चिंता नाही. मात्र, भविष्यात पावसाचे आगमन झाले तरच या पिकांना जीवदान मिळणार आहे. पेरणीयोग्य पाऊस झाला की नाही याचे मापन कसे करायचे यावर आधारित प्रात्यक्षिक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.भरत गिते यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले.

अन्यथा दुबार पेरणीचे संकट

ज्या भागामध्ये पुरेसा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट येणार नाही, ८० ते १०० मीमी पाऊस पडलेला असतांना किंवा जमीनीमध्ये 4 ते 6 इंच ओलावा गेलेला असतांना किंवा जमीनीमध्ये टिचभर ते इतभर ओलावा गेलेला असतांना पेरणी करावी असे आवाहन डॉ. प्रा. भरत गिते शास्त्रज्ञ, शंकरराव तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाशिम यांच्यावतीने करण्यात येत आहे.

खरिपाबाबत संभ्रम अवस्था

पावसामध्ये सातत्य नसल्याने यंदा खरीप हंगामाचे गणितच बिघडले आहे. आतापर्यंत पीक पेरणी होऊन शिवार हिरवेगार होणे अपेक्षित असताना राज्यात सरासरीपेक्षा निम्म्या क्षेत्रावरही पेरण्या झालेल्या नाहीत. सोयाबीन हे हंगामातील मुख्य पीक असून याचाही पेरा रखडलेला आहे. पावसावरच खरिपाचे भवितव्य ठरणार आहे .15 जुलैपर्यंत खरीप हंगामातील पेरण्या झाल्या नाहीत तर मात्र उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे.

Follow Us
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन