Nagpur : सरकारच्या भरवश्यावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना काय सल्ला.?

भारतामध्ये केवळ परमेश्वर आणि सरकार या दोघांवरच विश्वास ठेवला जातो. पण त्यामुळे सर्वकाही साध्य होईल असे नाही. त्यासाठी तुमचे प्रयत्नही गरजेचे आहेत. शेतकरी आता उत्पादन वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

Nagpur : सरकारच्या भरवश्यावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना काय सल्ला.?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 6:49 PM

नागपूर :  (Nitin Gadkari) नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री असले तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. शिवाय त्यांची रोखठोक वक्तव्य ही कायम चर्चेचा विषय राहिलेली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या (Agricultural prices) शेतीमालाला बाजारपेठ कशी मिळेल याबाबत ते नागपुरात मार्गदर्शन करीत होते. (Agricultural Production) शेती उत्पादन आणि बाजारपेठ याबाबत आयोजित कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नका, हे मी सरकारमध्ये असतानाही तुम्हाला सल्ला देत असल्याचे सांगितले. तर सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळेल आणि मग मालाचे दर वाढतील यावर अवलंबून न राहता उत्पादन वाढीबरोबर बाजारपेठ शोधण्यावरही लक्ष असणे आवश्यक आहे, असा त्यांचा सूर होता.

या दोनच गोष्टींवर विश्वास, तुमचे प्रयत्नही गरजेचे

भारतामध्ये केवळ परमेश्वर आणि सरकार या दोघांवरच विश्वास ठेवला जातो. पण त्यामुळे सर्वकाही साध्य होईल असे नाही. त्यासाठी तुमचे प्रयत्नही गरजेचे आहेत. शेतकरी आता उत्पादन वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवून उत्पन्नही वाढवा असा सल्ला त्यांनी दिला.

वास्तवतेचा विचार करा, भरवश्यावर राहू नका

आश्वासने आणि त्याची पूर्तता यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे कुणाच्याही भरवश्यावर राहू नकात. शेतीमालाचा दर आपोआप वाढणार नाहीतर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. आणि जर असे झाले नाहीतर नुकसान सरकारचे नाही तर तुमचेच होणार आहे. त्यामुळे तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे वाटचाल करा यश नक्की मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

सेंद्रीय शेतीमालावर भर द्या

रासायनिक पद्धतीचा अवलंब करुन पिकवलेला शेतीमाल हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मालाची चवही वेगळीच असते. काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या मालाला मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती ही अंमलात आणणे गरजेचे आहे. उत्पादनवाढीच्या नादात शेतीमालाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.