AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : सरकारच्या भरवश्यावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना काय सल्ला.?

भारतामध्ये केवळ परमेश्वर आणि सरकार या दोघांवरच विश्वास ठेवला जातो. पण त्यामुळे सर्वकाही साध्य होईल असे नाही. त्यासाठी तुमचे प्रयत्नही गरजेचे आहेत. शेतकरी आता उत्पादन वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

Nagpur : सरकारच्या भरवश्यावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना काय सल्ला.?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Sep 10, 2022 | 6:49 PM
Share

नागपूर :  (Nitin Gadkari) नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री असले तरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांची वेगळी ओळख निर्माण होत आहे. शिवाय त्यांची रोखठोक वक्तव्य ही कायम चर्चेचा विषय राहिलेली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या (Agricultural prices) शेतीमालाला बाजारपेठ कशी मिळेल याबाबत ते नागपुरात मार्गदर्शन करीत होते. (Agricultural Production) शेती उत्पादन आणि बाजारपेठ याबाबत आयोजित कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नका, हे मी सरकारमध्ये असतानाही तुम्हाला सल्ला देत असल्याचे सांगितले. तर सरकारकडून शेतीमालाला हमीभाव मिळेल आणि मग मालाचे दर वाढतील यावर अवलंबून न राहता उत्पादन वाढीबरोबर बाजारपेठ शोधण्यावरही लक्ष असणे आवश्यक आहे, असा त्यांचा सूर होता.

या दोनच गोष्टींवर विश्वास, तुमचे प्रयत्नही गरजेचे

भारतामध्ये केवळ परमेश्वर आणि सरकार या दोघांवरच विश्वास ठेवला जातो. पण त्यामुळे सर्वकाही साध्य होईल असे नाही. त्यासाठी तुमचे प्रयत्नही गरजेचे आहेत. शेतकरी आता उत्पादन वाढीवर भर देत आहे, पण मार्केटचे काय? त्यामुळे मार्केटही येथेच आहे त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सध्या सेंद्रिय शेतीमालाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवून उत्पन्नही वाढवा असा सल्ला त्यांनी दिला.

वास्तवतेचा विचार करा, भरवश्यावर राहू नका

आश्वासने आणि त्याची पूर्तता यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे कुणाच्याही भरवश्यावर राहू नकात. शेतीमालाचा दर आपोआप वाढणार नाहीतर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. आणि जर असे झाले नाहीतर नुकसान सरकारचे नाही तर तुमचेच होणार आहे. त्यामुळे तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार याप्रमाणे वाटचाल करा यश नक्की मिळेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

सेंद्रीय शेतीमालावर भर द्या

रासायनिक पद्धतीचा अवलंब करुन पिकवलेला शेतीमाल हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या मालाची चवही वेगळीच असते. काळाच्या ओघात पुन्हा सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या मालाला मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती ही अंमलात आणणे गरजेचे आहे. उत्पादनवाढीच्या नादात शेतीमालाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले.

Follow Us
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?