कोल्हापूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

कोल्हापूर: ऊस दराच्या तोडग्याचं संकट असताना, त्यापूर्वीच कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभा ठाकलं आहे. शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सरकारच्या मदतीशिवाय देणं शक्य नसल्याचा सूर कारखानदारांनी आवळला आहे. त्याचबरोबर आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखानदार आणि पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतरच जिल्ह्यातील सगळे कारखाने बंद ठेवण्याचा त्यांनी […]

कोल्हापूरच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

कोल्हापूर: ऊस दराच्या तोडग्याचं संकट असताना, त्यापूर्वीच कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभा ठाकलं आहे. शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सरकारच्या मदतीशिवाय देणं शक्य नसल्याचा सूर कारखानदारांनी आवळला आहे. त्याचबरोबर आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखानदार आणि पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक झाली. त्यानंतरच जिल्ह्यातील सगळे कारखाने बंद ठेवण्याचा त्यांनी निर्णय़ घेतला. विविध शेतकरी संघटनांनी केलेली मागणी सरकारच्या मदतीशिवाय देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं एफआरपीचा तोडगा निघण्याआधीचं ऊस उत्पादकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जर शेतातला ऊस शेतातच राहिला तर त्याला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.

संताजी घोरपडे, राजाराम, हमीदवाडा, गुरुदत्त यासह जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. मात्र त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन त्याला विरोध करु लागली. त्यामुळं रोष पत्करण्यापेक्षा तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा त्यांनी निर्णय़ घेतला आहे.

गेल्या हंगामात कुठल्या कारखान्याचं किती गाळप?

जवाहर शेतकरी साखर कारखाना १६ लाख ५४ हजार मेट्रीक टन गाळप

श्री दत्त शेतकरी साखर कारखाना ११ लाख ८७ हजार मेट्रीक टन गाळप

तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना १० लाख ८१ हजार मेट्रीक टन गाळप

दालमिया शुगर कारखाना ८ लाख ६० हजार मेट्रीक टन गाळप

संताजी घोरपडे साखर कारखाना ७ लाख ४ हजार मेट्रीक टन गाळप

सुरु झालेले कारखाने बंद करुन पुन्हा सुरु करणं हे कारखानदारांसाठी तोट्याचं आहे. मात्र विविध संघटनांच्या मागण्या आणि सुरु झालेलं आंदोलन यामुळं कारखानदारांनी गाळपच न करण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय सरकारच्या कोर्टात आता कारखानदारांनी चेंडू टाकला आहे. आता सरकार काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.