AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका

नैताळे गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे दोन एकरावरील जोमदार कांदा पिकावर मातीमोल कांद्याला बाजार भाव मिळत असल्याने नैराश्येपोटी कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवत असल्याची इतर शेतकऱ्यांना माहिती मिळाली.

कांद्याला मातीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्याने घेतली टोकाची भूमिका
| Updated on: Feb 25, 2023 | 1:00 PM
Share

उमेश पारीक, नाशिक : दोन ते चार रुपये इतका कांद्याला मातीमोल बाजार भाव (MARKET RATE) मिळत असल्याने कांदा पीक (Onion crop) शेतातून काढून बाजारपेठेत विक्रीसाठी नेणे परवडत नसल्याने कृषी प्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील तरुण शेतकऱ्याने वैतागून दोन एकरावरील पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या जोमदार कांदा पिकावर रोटर फिरवला आहे. कांद्याचं पीक भुईसपाट करत मातीमोल मिळणाऱ्या कांदा बाजार भावाचा निषेध व्यक्त करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर (NASHIK FARMER) आली आहे.

कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवला

नैताळे गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे यांनी आपल्या शेतात दोन एकरावर कांद्याचे पीक घेतले आहे. तीन महिन्यात एक ते सव्वालाख रुपये खर्च करत पोटच्या पोराप्रमाणे कांद्याचे पीक जोमदार वाढवले. पण देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्याने आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव सह राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव दोन ते चार रुपये कोसळले आहेत. उत्पादन खर्च तर दूरच शेतातून कांदा काढणी मजुरी आणि वाहतूक खर्च ही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या बोरगुडे यांनी नैराश्यापोटी आपल्या दोन एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या जोमदार कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवला आहे. केंद्र व राज्य सरकारने इतर प्रश्नापेक्षा शेतकर्यांकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नसल्याचे सुनील बोरगुडे यांनी सांगितले.

इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली, पण…

नैताळे गावातील तरुण कांदा उत्पादक शेतकरी सुनील बोरगुडे दोन एकरावरील जोमदार कांदा पिकावर मातीमोल कांद्याला बाजार भाव मिळत असल्याने नैराश्येपोटी कांदा पिकावर ट्रॅक्टरद्वारे रोटर फिरवत असल्याची इतर शेतकऱ्यांना माहिती मिळाली. त्यानंतर इत शेतकरी त्या ठिकाणी शेतावर पोहोचले रोटर न फिरवण्याची विनंती केली. मात्र ही विनंती बोरगुडे यांनी न ऐकता रोटर फिरवणे सुरूच ठेवल्याने संपूर्ण कांदा पीक हे भुईसपाट करत रान मोकळे केले आहे. केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकर्यांकडे लक्ष देण्याची मागणी करत असून विक्री झालेल्या कांद्याला 10 रुपये अनुदान तर विक्री होणार्या कांद्याला 30 हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरु लागली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी संजय साठे यांनी दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.