AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो सावधान अन्यथा पिकांचे नुकसान अन् आर्थिक फटकाही, किटकनाशक घेताना काय काळजी घ्यावी?

गेल्या वर्षभरापासून शेतकरी हा नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब बागांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव कमी व्हावा चकाकी यावी यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशकाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचा प्रकार कृषी विभागाच्या चोकशीत समोर आला आहे.

शेतकऱ्यांनो सावधान अन्यथा पिकांचे नुकसान अन् आर्थिक फटकाही, किटकनाशक घेताना काय काळजी घ्यावी?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 24, 2021 | 4:45 PM
Share

अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून शेतकरी हा नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब बागांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव कमी व्हावा चकाकी यावी यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशकाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचा प्रकार कृषी विभागाच्या चोकशीत समोर आला आहे. (Fake pesticides) बनावट बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे 25 लाखांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतेही किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पिकाचे तर नुकसान होईलच शिवाय किटकनाशकांवर होणारा खर्च हा वेगळाच.

नेमके काय झाले नगर जिल्ह्यातील गावडेवाडीत

गावडेवाडीतील प्रकाश व विनोद गावडे हे डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, डाळिंब काढणीला आले असताना त्यांच्यावर कीडीचा प्रादुर्भाव होऊ नये व चकाकी यावी याकरिता त्यांनी बायोसोल नावाचे बुरशीनाशक फवारले. मात्र, फवारणीनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये फळगळ होण्यास सुरवात झाली होती. यामध्ये त्यांचे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. झालेल्या घटनेनंतर त्यांनी कृषी विभागात तक्रार नोंद केली होती. मिरजगाव येथील निविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानावर छापेमारी केल्यानंतर त्या बुरशीनाशकाची कोणती कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समोर आले होते.

असे ओळखा बनावट किटकनाशक

किटकनाशकाच्या किमतीाधील फरक यावरवरुनही बनावट किटकनाशके हे ओळखता येते. शेतकरी किटकनाशके खरेदी करण्यात गेला असता विक्रेत्याकडून एमआरपी नुसार विक्री न करता अगदी कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतऱ्यांनीही कमी किमंत आहे म्हणून त्याची खरेदी करू नये असा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.ज्या कंपनीच्या किटकनाशकाला अधिकची मागणी आहे त्याच नामांकित कंपनीच्या नावानेच बोगस किटकनाशके ही बाजारात दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची अंतिम मुदतीची तारिख व इतर बाबी तपासूनच खरेदी करणे आवश्यक आहे.

गुणनियंत्रकाच्या मार्फत तपासणीच होत नाही

किटकनाशकांची तपासणी करूनच ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावीत असा नियम आहे. मात्र, तपासणी ह करताच ती शेतकऱ्यांवर लादली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय खरेदीनंतर शेतकऱ्यांना अधिकृत पावतीही दिली जात नाही.

संबंधित बातम्या :

Natural Farming : आता सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी कृषी विद्यापीठांचाही सहभाग, राज्य सरकारचा मोठा निर्णय

थकबाकीदारांना माफी, नियमित व्याज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ? उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली सरकारची रणनीती

Agrovision | बांबू लागवडीचे फायदे काय? नितीन गडकरींनी दिली बांबू टिश्यू कल्चरची माहिती

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक