AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांनो सावधान अन्यथा पिकांचे नुकसान अन् आर्थिक फटकाही, किटकनाशक घेताना काय काळजी घ्यावी?

गेल्या वर्षभरापासून शेतकरी हा नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब बागांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव कमी व्हावा चकाकी यावी यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशकाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचा प्रकार कृषी विभागाच्या चोकशीत समोर आला आहे.

शेतकऱ्यांनो सावधान अन्यथा पिकांचे नुकसान अन् आर्थिक फटकाही, किटकनाशक घेताना काय काळजी घ्यावी?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 4:45 PM
Share

अहमदनगर : गेल्या वर्षभरापासून शेतकरी हा नैसर्गिक संकटांना सामोरे जात आहे. मध्यंतरीच्या अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे डाळिंब बागांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. प्रादुर्भाव कमी व्हावा चकाकी यावी यासाठी फवारणी केलेल्या बुरशीनाशकाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचा प्रकार कृषी विभागाच्या चोकशीत समोर आला आहे. (Fake pesticides) बनावट बुरशीनाशकाच्या फवारणीमुळे 25 लाखांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतेही किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा पिकाचे तर नुकसान होईलच शिवाय किटकनाशकांवर होणारा खर्च हा वेगळाच.

नेमके काय झाले नगर जिल्ह्यातील गावडेवाडीत

गावडेवाडीतील प्रकाश व विनोद गावडे हे डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. मात्र, डाळिंब काढणीला आले असताना त्यांच्यावर कीडीचा प्रादुर्भाव होऊ नये व चकाकी यावी याकरिता त्यांनी बायोसोल नावाचे बुरशीनाशक फवारले. मात्र, फवारणीनंतर अवघ्या काही दिवसांमध्ये फळगळ होण्यास सुरवात झाली होती. यामध्ये त्यांचे 25 लाखाचे नुकसान झाले आहे. झालेल्या घटनेनंतर त्यांनी कृषी विभागात तक्रार नोंद केली होती. मिरजगाव येथील निविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानावर छापेमारी केल्यानंतर त्या बुरशीनाशकाची कोणती कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समोर आले होते.

असे ओळखा बनावट किटकनाशक

किटकनाशकाच्या किमतीाधील फरक यावरवरुनही बनावट किटकनाशके हे ओळखता येते. शेतकरी किटकनाशके खरेदी करण्यात गेला असता विक्रेत्याकडून एमआरपी नुसार विक्री न करता अगदी कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे शेतऱ्यांनीही कमी किमंत आहे म्हणून त्याची खरेदी करू नये असा सल्ला कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी दिला आहे.ज्या कंपनीच्या किटकनाशकाला अधिकची मागणी आहे त्याच नामांकित कंपनीच्या नावानेच बोगस किटकनाशके ही बाजारात दाखल होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची अंतिम मुदतीची तारिख व इतर बाबी तपासूनच खरेदी करणे आवश्यक आहे.

गुणनियंत्रकाच्या मार्फत तपासणीच होत नाही

किटकनाशकांची तपासणी करूनच ती बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावीत असा नियम आहे. मात्र, तपासणी ह करताच ती शेतकऱ्यांवर लादली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय खरेदीनंतर शेतकऱ्यांना अधिकृत पावतीही दिली जात नाही.

संबंधित बातम्या :

Natural Farming : आता सेंद्रिय शेतीला गती देण्यासाठी कृषी विद्यापीठांचाही सहभाग, राज्य सरकारचा मोठा निर्णय

थकबाकीदारांना माफी, नियमित व्याज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ? उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली सरकारची रणनीती

Agrovision | बांबू लागवडीचे फायदे काय? नितीन गडकरींनी दिली बांबू टिश्यू कल्चरची माहिती

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.