AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PIK VIMA : फळ पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कायम, खा. रक्षा खडसेंच्या निर्देशानंतर लागणार का प्रश्न मार्गी?

शेतकऱ्यांना केवळ हंगामी पिकांचा विमा परतावा मिळण्यातच अडचणी नाहीत तर फळबाग धारकांचीही अवस्था तशीच आहे. जिल्ह्यात फळबाग विमा योजनेतील सहभागापासून परतावा मिळण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता खा. रक्षा खडसे यांनी पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गा लावण्यासंदर्भात आढावा बैठकीत सुचना केल्या आहेत.

PIK VIMA : फळ पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी कायम, खा. रक्षा खडसेंच्या निर्देशानंतर लागणार का प्रश्न मार्गी?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 12, 2022 | 10:31 AM
Share

जळगाव : शेतकऱ्यांना केवळ हंगामी पिकांचा विमा परतावा मिळण्यातच अडचणी नाहीत तर (Fruit Crop Insurance) फळबाग धारकांचीही अवस्था तशीच आहे. जिल्ह्यात फळबाग विमा योजनेतील सहभागापासून परतावा मिळण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या कायम आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता (Raksha Khadse) खा. रक्षा खडसे यांनी पीक विमा कंपनीचे प्रतिनीधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गा लावण्यासंदर्भात आढावा बैठकीत सुचना केल्या आहेत. राज्यात पीक विमा कंपन्यांचा मनमानी कारभार सुरु असून खरीप हंगामातील विमा रकमेपासून तब्बल 84 हजार शेतकरी हे अद्यापही वंचित आहेत. अशातच यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अडचणीत असतानाच जिल्ह्यातील यावल या तालुक्यालाच फळ पीक विमा योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचे निर्देश खा. खडसे यांनी दिले आहेत.

निसर्गाचा लहरीपणा त्यात विमा कंपनीचा मनमानी कारभार

यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. खरीप हंगामापासून सुरु झालेली नुकसानीची मालिका पुढे फळबागा आणि आता रब्बी हंगामातही सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये तर वाढ झालीच नाही पण नुकसानभरपाईसाठी विमा कपंन्यांच्या परताव्याचा आधार घ्यावा लागत आहे. बदलत्या वातावरणामुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून भरपाई मिळते मात्र, त्यासाठी विमा हप्ता अदा करुन सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. या माध्यमातून अधिकचे उत्पन्न नाही किमान पीकावर झालेला खर्च तरी पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी अन् खासदारांच्या सूचना

सन 2021-22 च्या हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभागच विमा कंपनीने करुन घेतलेला नाही. त्यामुळे हजारो शेतकरी हे विमा योजनेपासून वंचित राहणार आहेत. हवामान अधारित विमा योजनेत सहभाग घेता येत असताना डावलण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी खा. रक्षा खडसे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांचा योजनेत सहभाग करुन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनी आता काय भूमिका घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

Animal Bloating : कशामुळे फुगते जनावरांचे पोट? काय आहे उपाययोजना, वाचा सविस्तर

Corona Effect : कोरोना निर्बंधाचे परिणाम पोल्ट्री व्यवसयावर, मागणीतही घट

आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय आहे रणनीती?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या