Surplus Sugarcane : कारखान्यापासून 25 किमी अंतरावरच होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा ऊस, लाल बावट्याच्या मागण्या काय ?

ऊस गाळपाबाबत साखर कारखान्याचे योग्य नियोजन नसल्यानेच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या नामदेव जाधव यांनी ऊस फडातच राहिल्याने आत्महत्या केली त्या ऊसाच्या फडापासून साखर कारखाना अवघ्या 25 किलोमीटरवर होता.

Surplus Sugarcane : कारखान्यापासून 25 किमी अंतरावरच होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा ऊस, लाल बावट्याच्या मागण्या काय ?
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 2:19 PM

बीड : गतआठवड्यात ज्या (Surplus Sugarcane) अतिरिक्त ऊसाच्या धास्तीने गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. विशेष म्हणजे ऊसाच्या फडापासून केवळ 25 किमी अंतरावर (Sugar Factory) साखर कारखाना असताना नामदेव जाधव यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले होते. आता या घटेनच्या निषेधार्थ विविध संघटना समोर आल्या आहेत. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळेच अशा घटना घडतात. आता दोन वर्ष उलटले तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा (Crop Insurance) पीक विम्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. अशा कारणांमुळे शेतकरी टोकाचा निर्णय घेतो. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आता लाल बावटा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले.

साखर कारखान्यावर कारवाई गरजेची

ऊस गाळपाबाबत साखर कारखान्याचे योग्य नियोजन नसल्यानेच अतिरिक्त उसाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे. गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या नामदेव जाधव यांनी ऊस फडातच राहिल्याने आत्महत्या केली त्या ऊसाच्या फडापासून साखर कारखाना अवघ्या 25 किलोमीटरवर होता. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लाल बावटा संघटनेने केली आहे.

पीकविम्याचाही प्रश्न रखडला

बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा गेल्या दोन वर्षापासून पीकविमा रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांचा कारभार हा केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतो मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकार तत्पर नसल्याचेच समोर येत आहे. सन 2020-21 मधील पीकविमा अद्यापही विमा कंपन्यांकडेच आहे. यासंबंधी अनेक वेळा आंदोलन करुनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. यामुळेच सरकारबद्दल शेतकऱ्यांचा रोष वाढत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोन संघटना एकत्र

बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊस आणि रखडलेला पीकविमा या दोन समस्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या डोकेदुखीच्या ठरत आहेत. यावर योग्य तो तोडगाच निघत नाहीत त्यामुळे पुन्हा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र किसान सभा आणि लाल बावटा आक्रमक झालेत. बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन सुरू आहे. मराठवाड्यात जालना पाठोपाठ बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही बाबींवर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.