AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : डाळिंब बागांना आता वाढत्या उन्हाचा धोका, काय आहे उपाययोजना?

मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात उन्हामध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याताल सपाटणे परिसरात पारा 40 शी पार गेला आहे. त्यामुळे डाळिंब झाडे ही तणावात आहेत तर वाढत्या उन्हामुळे आंबे बहरातील फळे ही तडकली जात आहेत. उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात, तर काढणी योग्य तयार झालेले फळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

Nashik : डाळिंब बागांना आता वाढत्या उन्हाचा धोका, काय आहे उपाययोजना?
| Updated on: May 21, 2022 | 1:26 PM
Share

नाशिक : राज्यभरातील (Pomegranate garden) डाळिंब बागांना कीड, रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. हे कमी म्हणून की काय आता (Temperature) वाढत्या उन्हामुळे डाळिंब उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मध्यंतरी (Unseasonable Rain) अवकाळी पाऊस आणि किड रोगराईचा प्रादुर्भाव असातनाही शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन बागा जोपासल्या पण आंबीया बहरातील फळे काढणीसाठी तयार होत असताना वाढत्या उन्हाचा बागांवर परिणाम होत आहे. 40 अंशावर तापमान गेल्यावर हा धोका निर्माण होतो. आतापर्यंत शेतकऱ्यांनी विविध समस्यांवर पर्याय काढलेला आहे. मात्र, आतादेखील शेतकरी विविध उपाययोजना करुन बागा जोपासण्याचे काम करीत आहेत.

वाढत्या उन्हाचा नेमका परिणाम काय?

मराठवाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात उन्हामध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याताल सपाटणे परिसरात पारा 40 शी पार गेला आहे. त्यामुळे डाळिंब झाडे ही तणावात आहेत तर वाढत्या उन्हामुळे आंबे बहरातील फळे ही तडकली जात आहेत. उन्हामुळे फळांवर चट्टे पडतात, तर काढणी योग्य तयार झालेले फळ टिकवून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. फळांचा दर्जाही ढासळतो असे दुष्पपरिणाम हे बागांवर होत आहे.

काय आहे उपाययोजना?

डाळिंब बागांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना गरजेनुसार जुन्या साड्या, कापड याचा वापर करावा लागणार आहे. बाष्पप्रतिरोधक फवारल्यास झाडातील पाणी टिकून राहते. फळांच्या शिफारशीनुसार कपड्याच्या व कागदाचा वापर करावा लागणार आहे. शिवाय रात्रीच्या वेळी बागांना पाणी द्यावे लागणार आहे तर बागांमध्ये पाणी टिकवून कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अंतिम टप्प्यात बागा जोपासणे महत्वाचे

डाळिंब बागा आता अंतिम टप्प्यात आहेत. मध्यंतरी अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा आणि कीड रोगराईचा प्रादुर्भाव यामधून शेतकऱ्यांनी बागाची जोपसणा केली मात्र, वाढत्या उन्हाचा धोका हा कायम आहे. जर 43 ते 44 अंशापर्यंत पारा गेला तर मात्र, बागांवर नेटचे अच्छादन गरजेचे आहे. बागा जोपासण्यासाठी सुधारित पध्दतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे उत्पादक शेतकरी सांगत आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.