AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या ‘त्या’ 48 गावातील पीकांचेही होणार पंचनामे ; पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश

बार्शी तालुक्यातील 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे (Panchanama) हे वगळण्यात आले होते. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान होणार होते. (Damage Crop) पीकाचे नुकसान शिवाय मदतीसाठी या गावचे शेतकरी हे पात्र झाले नसते. परंतू या 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे करुन घेण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या 'त्या' 48 गावातील पीकांचेही होणार पंचनामे ; पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 16, 2021 | 12:13 PM
Share

सोलापूर : मराठवाड्याप्रमाणेच या विभागालगतच्या जिल्ह्यातील खरीप पीकांचे पावसामुळे नुकसान झालेले होते. मात्र, बार्शी तालुक्यातील 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे (Panchanama) हे वगळण्यात आले होते. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान होणार होते. (Damage Crop) पीकाचे नुकसान शिवाय मदतीसाठी या गावचे शेतकरी हे पात्र झाले नसते. परंतू या 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे करुन घेण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे पंचनामे तर होणार असून नुकसानभरपाईबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे.

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे केवळ खरीप हंगामातील पीकाचेच नाही तर फळबागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडलांस अतिवृष्टीतून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता आ. राजेंद्र राऊत आणि अरुण बारबोले यांनी या 48 गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

यामुळे वगळण्यात आली होती गावे

बार्शी तालुक्यातील मंडळानिहाय पावसाचे प्रमाण हे कमी-अधिक आहे. त्यामुळे वैराग, खांडवी, सुर्डी व नारी ही मंडळे वगळता पंचनामे करण्यात आले. मात्र, या चार मंडळात सततचा पाऊस नसल्याचे कारण सांगत पंचनामे करण्यात आले नव्हते. मात्र, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि आर्थिक कोंडी लक्षात घेता आ. राजेंद्र राऊत यांनी या 48 गावातील पीकांचेही नुकसान झालेले आहे. येथील अधिकारी- कर्मचारी यांना पंचनामे करुन घेण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार आता पंचनामे केले जाणार आहेत.

सोयाबीनसह कांद्याचेही नुकसान

बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडळातील पंचनामे झालेले नाहीत. मात्र, पावसामुळे येथील सोयाबीन या मुख्य पीकाचे तर नुकसान झालेच आहे पण पावसाळी कांद्याचाही वांदा झालेला आहे. असे असतानाही सततचा पाऊस या मंडळात नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे पंचनामे होणार की नाही अशी अवस्था झाली होती. अखेर पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदतीबाबत या 48 गावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

सरासरीपेक्षा दीडपट पाऊस

बार्शी तालुक्यात पावसाची सरासरी ही 524 मि.मी एवढी आहे. यंदा मात्र, आतापर्यंत 765 मि. मी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे फळपिके, भाजीपाला याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पण त्या आगोदर संपूर्ण तपासणी करुन पंचनामे करण्याचे सांगण्यात आल्याने पंचनामे झाले तरी प्रत्यक्षात अहवाल काय जाणार यावरच मदतीचे स्वरुप अवलंबून आहे. (Farmers ordered to conduct panchnamas for crop damage in villages excluded from heavy rains)

संबंधित बातम्या :

मराठवाड्याला निकषांपेक्षा अधिकची नुकसानभरपाई, पहा तुमच्या जिल्ह्याला कितीची मदत?

तयारी रब्बी हंगामाची : ज्वारीच्या उत्पादनाची वाढ अन् काय दुहेरी फायदा ?

गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा

Follow Us
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान