AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला

आता पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे. आता पावसाने उघडीप दिली असून या काळात शेतकऱ्यांनी नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे आणि रब्बीची कशी तयारी करावी याबाबत आपण पाहणार आहोत..

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला
पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन मळणीची लगबग
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 22, 2021 | 11:13 AM
Share

लातूर : पावसाचा अंदाज वर्तवला तरी शेतकऱ्यांची धाकधूक होत होती. गेल्या दोन महिन्यापासून हे चक्र सुरु होते. कधी नव्हे ते शेतकरी हे पावसाच्या अंदाजाबाबत कमालीचे जागृत झाले होते. यंदा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेले अंदाज अगदी तंतोतंत ठरले आहेत. पण आता (Rain Stop) पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे. (Rabbi Hangam) आता पावसाने उघडीप दिली असून या काळात शेतकऱ्यांनी नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे आणि रब्बीची कशी तयारी करावी याबाबत आपण पाहणार आहोत..

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे ती आता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बुधवारपासून मराठवाड्यात सुर्यदर्शन होत आहे. अनेक शेतकऱ्यांची अजूनही खरीपातील कामे रखडलेली आहेत शिवाय रब्बीच्या पेरणीला उशीर होत आहे. त्यामुळे आता योग्य नियोजन केले तरच रब्बी साधणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या कामांना द्या प्राधान्य

रब्बीच्या पेरणीचा मोसम हा सप्टेंबर महिन्यातच असतो. यंदा मात्र, पावसामुळे वेळेत पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. अजूनही खरीपातील पिकांची काढणी आणि मळणी हीच कामे सुरु आहेत. पण सध्या ऑक्टोंबर हीट जाणवू लागलेली आहे. पाऊस अधिक प्रमाणात झाला असला तरी शेतजमिनी ह्या आवळून येत आहेत म्हणजे भुसभुशीत राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हलक्या प्रकारची मशागतीची कामे करुन जमिनीत ओल आहे तोपर्यंत पेरणी कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

उशीराने पेरणीचा काय परिणाम होणार ?

दरवर्षी रब्बीची पुर्वतयारी म्हणून मशागतीला अधिकचे महत्व दिले जाते. मात्र, खरीप हंगामात नांगरण, मोगडण केल्याने आता पुन्हा मशागत करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने रोटरुन पेरणी केली तरी उगवण क्षमतेवर काही फरक पडणार नाही. शिवाय यंदा दीड महिना उशीराने पेरणी होत आहे. मात्र, याचा उत्पादनावर काही परिणाम होणार नसल्याचे मत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे.

सोयाबीनची मळणी अन् कापसाची तोडणी

पावसामुळे सोयाबीन काढणीत अनेक वेळा अडथळे आले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांची काढणीची कामे राहिली आहेत तर काहींनी काढणी करुन गंजी लावलेल्या आहेत. आता 20, 21, 22, 23, 24, 25, 26 व 27 ऑक्टोबर ला राज्यात वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी काढणी-मळणी करुन सोयाबीन हे ऊनात वाळवून साठवणूक करणे आवश्यक आहे. शिवाय डागाळलेल्या सोयाबीनची आहे त्या दरात विक्री करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहणार आहे.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, दोन दिवसांपासून थंडी वाढलेली आहे. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. (Farmers prepare for rabi season as rain stops stalled work)

संबंधित बातम्या :

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन

केळीमध्येही बुरशीजन्य रोग, वेळीच काळजी घ्या अन्यथा उत्पादनावर परिणाम

नागपूरी संत्री सातासमुद्रापार, मोसंबीच्या निर्यातीचाही मार्ग मोकळा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!.

Ayesha Khan Detained : प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान पोलिसांच्या ताब्यात, आंदोलनस्थळी आल्याने तातडीने कारवाई!

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ