AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला

आता पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे. आता पावसाने उघडीप दिली असून या काळात शेतकऱ्यांनी नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे आणि रब्बीची कशी तयारी करावी याबाबत आपण पाहणार आहोत..

पाऊस गेला गावाला, आता लागा कामाला ; काय आहे शेतकऱ्यांना सल्ला
पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन मळणीची लगबग
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 22, 2021 | 11:13 AM
Share

लातूर : पावसाचा अंदाज वर्तवला तरी शेतकऱ्यांची धाकधूक होत होती. गेल्या दोन महिन्यापासून हे चक्र सुरु होते. कधी नव्हे ते शेतकरी हे पावसाच्या अंदाजाबाबत कमालीचे जागृत झाले होते. यंदा हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेले अंदाज अगदी तंतोतंत ठरले आहेत. पण आता (Rain Stop) पाऊस संपला असून शेतकऱ्यांनी खरीपातील रखडलेली कामे आटोपून रब्बीच्या तयारीला लागण्याचा सल्ला हवामानतज्ञ डख यांनी दिला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष: सोयाबीनच्या उत्पादनात घट झालीच आहे. शिवाय पावसात भिजल्याने सोयाबीन हे डागाळलेले आहे. (Rabbi Hangam) आता पावसाने उघडीप दिली असून या काळात शेतकऱ्यांनी नेमके कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे आणि रब्बीची कशी तयारी करावी याबाबत आपण पाहणार आहोत..

दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे ती आता कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे बुधवारपासून मराठवाड्यात सुर्यदर्शन होत आहे. अनेक शेतकऱ्यांची अजूनही खरीपातील कामे रखडलेली आहेत शिवाय रब्बीच्या पेरणीला उशीर होत आहे. त्यामुळे आता योग्य नियोजन केले तरच रब्बी साधणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

या कामांना द्या प्राधान्य

रब्बीच्या पेरणीचा मोसम हा सप्टेंबर महिन्यातच असतो. यंदा मात्र, पावसामुळे वेळेत पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. अजूनही खरीपातील पिकांची काढणी आणि मळणी हीच कामे सुरु आहेत. पण सध्या ऑक्टोंबर हीट जाणवू लागलेली आहे. पाऊस अधिक प्रमाणात झाला असला तरी शेतजमिनी ह्या आवळून येत आहेत म्हणजे भुसभुशीत राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हलक्या प्रकारची मशागतीची कामे करुन जमिनीत ओल आहे तोपर्यंत पेरणी कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.

उशीराने पेरणीचा काय परिणाम होणार ?

दरवर्षी रब्बीची पुर्वतयारी म्हणून मशागतीला अधिकचे महत्व दिले जाते. मात्र, खरीप हंगामात नांगरण, मोगडण केल्याने आता पुन्हा मशागत करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने रोटरुन पेरणी केली तरी उगवण क्षमतेवर काही फरक पडणार नाही. शिवाय यंदा दीड महिना उशीराने पेरणी होत आहे. मात्र, याचा उत्पादनावर काही परिणाम होणार नसल्याचे मत कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी व्यक्त केले आहे.

सोयाबीनची मळणी अन् कापसाची तोडणी

पावसामुळे सोयाबीन काढणीत अनेक वेळा अडथळे आले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांची काढणीची कामे राहिली आहेत तर काहींनी काढणी करुन गंजी लावलेल्या आहेत. आता 20, 21, 22, 23, 24, 25, 26 व 27 ऑक्टोबर ला राज्यात वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी काढणी-मळणी करुन सोयाबीन हे ऊनात वाळवून साठवणूक करणे आवश्यक आहे. शिवाय डागाळलेल्या सोयाबीनची आहे त्या दरात विक्री करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहणार आहे.

कांद्यावर फवारणी गरजेची

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हा कांदा पीकावर होत आहे. पावसाळी कांदा लागवड करुन काही दिवसाचाच कालावधी लोटलेला आहे. मात्र, दोन दिवसांपासून थंडी वाढलेली आहे. त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होताच मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मिली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा, तपकिरी आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून करणे आवश्यक आहे. शिवाय धुईचे प्रमाणही वाढत असल्याने कांद्याचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे ही फवारणी त्वरीत करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. (Farmers prepare for rabi season as rain stops stalled work)

संबंधित बातम्या :

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन

केळीमध्येही बुरशीजन्य रोग, वेळीच काळजी घ्या अन्यथा उत्पादनावर परिणाम

नागपूरी संत्री सातासमुद्रापार, मोसंबीच्या निर्यातीचाही मार्ग मोकळा

Follow Us
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?