AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Damage to vineyards : बुडत्याला काडीचा आधार, फळबागांचे नुकसान लाखोंत अन् भरपाई हजारो रुपयांमध्ये

नुकसानीची तीव्रता पाहता लागलीच पंचनामे करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. वेळप्रसंगी कागदावर नोंदी घ्या पण पंचनाम्यास विलंब होता कामा नये अशा सुचनाच त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या या तत्परतेमुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असली तरी नुकसानीच्या तुलनेत तोडकी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

Damage to vineyards : बुडत्याला काडीचा आधार, फळबागांचे नुकसान लाखोंत अन् भरपाई हजारो रुपयांमध्ये
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 30, 2021 | 4:30 PM
Share

इंदापूर : महिनाभरापूर्वी झालेल्या (Untimely Rain) अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते. नुकसानीची तीव्रता पाहता लागलीच पंचनामे करण्याचे आदेश राज्य कृषिमंत्री (Dadaji Bhuse) दादा भुसे यांनी दिले होते. वेळप्रसंगी कागदावर नोंदी घ्या पण पंचनाम्यास विलंब होता कामा नये अशा सुचनाच त्यांनी दिल्या होत्या. त्यांच्या या तत्परतेमुळे इंदापूर तालुक्यातील ( Assistance to grape growers) द्राक्ष बागायत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असली तरी नुकसानीच्या तुलनेत तोडकी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. बाग जोपासण्या हेक्टरी लाखोंचा खर्च झाला असताना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी केवळ 18 हजार रुपये देण्यात आले आहेत.

पंचनामा अहवालानुसार मदत

ऐन काढणीला महिन्याचा कालावधी असतानाच अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. द्राक्ष आणि आंबा फळपिकाचे अधिक नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची प्रक्रिया लवकर सुरु झाली होती. त्यामुळेच नाशिक, सांगली, इंदापूर पुणे येथील नुकसानीचे अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. सर्वच जिल्ह्यात पंचनामे झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशच संबंधित विभागाला नव्हते. त्यामुळे अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.

अशी आहे नुकसानभरपाईचे स्वरुप

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम फळबागांवर तर झालाच होता पण काही भागांमध्ये रब्बीची दुबार पेरणीही करावी लागली होती. असे असताना आता द्राक्षबागांच्या नुकासानीपोटी हेक्टरी 18 हजार रुपये मदत करण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील 61 गावांमधील 825 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे 815 हेक्टरावरील द्राक्षाचे नुकसान झाले होते. त्याबदल्यात तालुक्याला 74 लाख 73 हजार रुपये मिळाले असल्याचे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब रुपनकर यांनी सांगितले आहे.

अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

नुकसानभरपाईची रक्कम तोकडी असली तरी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. अवकाळीमुळे उत्पादनात तर घट झालीच आहे पण आता मालावर देखील फरक आहे. महिन्याभराच्या कालावधीनंतरही अजून नुकसानीचा अहवालच कृषी विभागाकडे सादर झालेले नाहीत. ज्या जिल्ह्यातून अहवाल सादर होईल त्यांना मदत केली जात आहे. पण नुकसानीच्या तुलनेत होत असलेली मदत ही नाममात्र असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.

संबंधित बातम्या :

Sugarcane Sludge : ऊसाचे गाळप कासवगतीने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाथरी येथे रास्तारोको

तूर खरेदी केंद्र सुरु होत असतानाच व्यापाऱ्यांचा असा ‘हा’ निर्णय, शेतकरीही गेले चक्रावून

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप