AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार

कापसाच्या दरावर फरदड कापसाचे उत्पादन घ्यायचे का नाही याबाबत द्वीधा मनस्थिती शेतकऱ्यांची होती. मात्र, काही दिवसांमध्येच फरदड कापसामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता फरदडची काढणी आणि रब्बी हंगामात सुर्यफूल पेरणी व कांद्याच्या लागवडीवर भर दिला जात आहे.

ठरलं तर मग : शेतकऱ्यांना मिळाला फरदड कापसाला योग्य पर्याय, आता आंतरपिकातून उत्पादनही वाढणार
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 2:08 PM
Share

औरंगाबाद : कापसाच्या (Cotton crop) दरावर फरदड कापसाचे उत्पादन घ्यायचे का नाही याबाबत द्वीधा मनस्थिती शेतकऱ्यांची होती. मात्र, काही दिवसांमध्येच फरदड कापसामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता फरदडची काढणी आणि रब्बी हंगामात सुर्यफूल पेरणी व (onion cultivation) कांद्याच्या लागवडीवर भर दिला जात आहे. जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी कापूस काढणीवर भर दिलेला आहे. दुसरीकडे कापसाचे दर वाढूनही शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अखेर फरदड कापूस काढणी केली आहे.

कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर

सध्या मराठवाड्यासह उत्तर भारतामध्येही कांदा लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. ऊसामध्येही आंतरपिक म्हणून कांद्याची लागवड केली जात आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ झाली रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र हे वाढत आहे. यातच फरदड कापसाचे क्षेत्र हे रिकामे झाल्यामुळे कांदा किंवा सुर्यफूलाचा पेरा केला जात आहे. मध्यंतरी वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपाचे नुकसान झाले होते. पण बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पेरा केलेला आहे. दरवर्षी पारंपारिक पिकांना बाजारभाव हा नियंत्रणातच असतो. त्यामुळे हरभरा, गहू याचे पिक न घेता शेतकरी नगदी पीक असलेल्या कांद्यावर भर देत आहेत.

सुर्यफूल पेरणीयोग्य शेतजमिन

काळाच्या ओघाच सुर्फूलाच्या क्षेत्रामध्ये मराठवाड्यात घट झाली होती. पण आता पोषक वातावरण आणि तेलबियाला मिळत असलेल्या दरामुळे पुन्हा सुर्यफूलाचे क्षेत्रात वाढ होत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यांमध्ये क्षेत्र वाढत आहे. शिवाय आता फरदड कापसाचे क्षेत्र रिकामे झाले असल्याने कापूस किंवा सुर्यफूल या दोन पिकांवरच शेतकऱ्यांचा भर आहे. जानेवारी अखेरपर्यंत पेरा झाला तरी उत्पादनात फरक पडणार नसल्याने शेतकरी निश्चिंत आहेत.

फरदड कापसामुळे काय होते?

सध्या वातावरणातील बदलामुळे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच कापूस शेतामध्ये कायम ठेवला तर अळीचा प्रादुर्भाव हा वाढणारच आहे. एवढेच नाही तर फरदड कापसाचा शेत जमिनीवरही परिणाम होत असतो. आगामी वर्षात उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. तर आता रब्बी हंगामातील पिकांची उगवण झाली आहे. या फरदड कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होण्याचा धोका आहे. त्यामुळे तात्पूरत्या फायद्यासाठी शेतकऱ्यांनी आगामी हंगामातील आणि शेतजमिनीचे नुकसान करुन घेऊ नये असा सल्ला कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural pump : वीजप्रश्न पेटला, अख्खं गाव बैल-बारदाणा घेऊन महावितरणच्या दारी

अतिवृष्टीची नुकसनभरपाई जमा होताच अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, काय आहे शिवारातील चित्र?

दोन दिवस धोक्याचेच, वातावरणानुसार शेती पिकांची ‘अशी’ घ्या काळजी, कृषितज्ञांचा शेतकऱ्यांना काय सल्ला?

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.