ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

आजही राज्यातील शेतकरी हे बाजारपेठेचा विचार न करता पारंपारिक पध्दतीने फळ लागवड करतात. मात्र, त्यामुळे उत्पादन वाढले तरी उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आता ज्या फळांना 'जीआय टॅग' मिळाले आहे त्याच फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ज्याला मागणी, त्याच फळाची होणार लागवड ; सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 12:32 PM

लातूर : आजही राज्यातील शेतकरी (Farmer) हे बाजारपेठेचा (Marker) विचार न करता पारंपारिक पध्दतीने फळ लागवड करतात. मात्र, त्यामुळे उत्पादन वाढले तरी उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आता ज्या फळांना ‘जीआय टॅग’ मिळाले आहे त्याच फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ‘जीआय’ प्रदान झालेल्या फळाचे महत्व वाढणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वाढत्या उत्पादनाबरोबर त्या उत्पादनाचा इतिहास, दर्जा, सातत्य, वैशिष्ट आणि मागणी यावर भौगोलिक मानांकन दिले जाते. यावरून फळाचा दर्जा ठरतो तर फळाची एक वेगळी ओळख निर्माण होते. फळ उत्पादकांना मानांकन मिळाल्याने अधिक उत्साह वाढतो व त्या फळाविषयी आपलेपणा निर्माण होतो. आता एवढ्यावरच न थांबता याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. राज्यात नाशिकच्या द्राक्षांपासून ते कोकणच्या आंब्यापर्य़ंत भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होण्याच्या आता उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार आहे.

मागणी आहे, पण मार्केटींग गरजेची

भौगोलिक मानांकन मिळालेल्या फळाला देशात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, या फळांची मार्केटींगच होत नसल्याने सर्वसामान्य ग्राहकच या वैशिष्टपूर्ण फळाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे जीआय प्रदान करण्यात आलेल्या फळांची मार्केटींग करुन त्याचे महत्व सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा उपक्रम आता राज्य सरकारच राबवणार आहे.

जीआय मानांकन मिळाल्याचा फायदा इतर फळांनाही

नाशिकच्या द्राक्षाला जीआय मानांकन मिळाले तर आपोआपच इतर फळांचेही महत्व त्या ठिकाणी निर्माण होते. त्यादृष्टीने फळ वाढवण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. केवळ उत्पादनच नाही तर लागवड पध्दतीपासून ते बाजारपेठ इथपर्यंतचे मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना केले जाणार आहे. मानांकन मिळालेल्या फळा व्यतिरीक्त फळ उत्पादकांनाही मानांकनासाठी नोंदणी करण्याची पध्दत ही सांगितली जाणार आहे.

जीआय मानांकन फळाला वेगळेच महत्व

जीआय मानांकन प्रदान झालेल्या फळाला एक वेगळेच महत्व असते. केवळ बागायत शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य ग्राहकही याकडे वेगळ्याच अपेक्षेने पाहत असतो. फळाची गुणवत्तेमुळे बागायातदार शेतकरीही समृध्द होत असतो. त्याचबरोबर काही ग्राहकांच्याही अपेक्षा असतात त्या पूर्णक करण्यासाठी किंवा उत्पादकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत.

20 हून अधिक फळांना जीआय मानांकन

राज्यातील 20 हून अधिक फळांना भौगोलिक मानांकन प्रदान करण्यात आलेले आहे. त्यामुळे या फळांसोबत इतर फळांचाही दर्जा आपोआपच वाढणार आहे. आवश्यकता आहे ती मार्केटींगची. त्या अनुषंगानेच सरकर प्रयत्न करीत आहे. नाशिकच्या द्रांक्षांपासून ते कोकणच्या आंब्यापर्यंत इतरही फळांना बाजारभाव जास्त कसा मिळेल शिवाय या फळांनाही नामांकन मिळाल्याचा फायदा कसा करून घेता येईल यासाठी राज्य सरकार आता उपक्रम राबवणार आहे. Geographically rated orchards to be overcultivated, state government initiative

संबंधित बातम्या :

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील पात्रतेबाबत ‘अफवा अन् वास्तव’

खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण ‘अशी’ करा पूर्वतयारी…

पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं

Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.