AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापूस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, यावर्षी मिळेल बंपर कमाई, निर्यातीतही होईल 20% वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मोठी मागणी असून या बाजारात चांगले भावदेखील दिसू लागल्याने या हंगामात 10 लाखांहून अधिक गठ्ठ्यांच्या निर्यातीत वाढ होऊ शकते. (Good news for cotton farmers, bumper earnings will be available this year, exports will also increase by 20%)

कापूस शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी, यावर्षी मिळेल बंपर कमाई, निर्यातीतही होईल 20% वाढ
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Apr 26, 2021 | 5:30 PM
Share

नवी दिल्ली : कापूस शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (CAI) असा अंदाज वर्तविला आहे की यावेळी देशातून कापसाची निर्यात 20 टक्क्यांनी वाढू शकते. देशाच्या विविध भागात कापसाची पेरणी सुरु झाली असून ते मे महिन्यापर्यंत चालू राहू शकते. सीएआयने असेही म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची महागाई होईल, ज्यामुळे भारताला निर्यातीचा फायदा होईल. (Good news for cotton farmers, bumper earnings will be available this year, exports will also increase by 20%)

मागील वर्षी (2019-20) हंगामात 50 लाख गठ्ठे भारतातून निर्यात करण्यात आल्या असून यावेळी ते 60 लाखाहून अधिक होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मोठी मागणी असून या बाजारात चांगले भावदेखील दिसू लागल्याने या हंगामात 10 लाखांहून अधिक गठ्ठ्यांच्या निर्यातीत वाढ होऊ शकते. भारताचा कापूस इतर देशांपेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे इतर देशांकडून भारतीय कापसाची मागणी वाढू शकते. याचा फायदा येथील शेतकर्‍यांना होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 10-15 टक्क्यांपर्यंत कापसाच्या किंमतींमध्ये तफावत आहे.

कापसाचे उत्पादन वाढेल

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे मूल्य अमेरिकन डॉलरनुसार निश्चित केले जाते. 31 मार्च 2021 पर्यंत भारतातून 43 लाख गठ्ठे निर्यात करण्यात आले आहेत. यावर्षी कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता सीएआयने व्यक्त केली आहे. देशाच्या उत्तर भागात कापसाची बंपर पेरणी झाली आहे, ज्यामुळे उत्पादनात 360 लाख गठ्ठे वाढू शकतात. फेब्रुवारी महिन्यातील अंदाजापेक्षा यंदा उत्पन्न जास्त असणे अपेक्षित आहे.

यावर्षी किती असेल उत्पादन

एका अंदाजानुसार 2020-21 मध्ये 360 लाख कापसाचे गठ्ठ्यांचे उत्पादन केले जाऊ शकते. यावेळी देशाच्या उत्तर भागात दीड लाख गठ्ठे अधिक असण्याची शक्यता आहे. या हंगामात हरियाणा, राजस्थानमध्ये उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीही देशात 360 लाख गठ्ठ्यांचे उत्पादन झाले होते. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 459.26 लाख गठ्ठ्यांची निर्यात करण्यात आली आहे. देशातही कापसाची मागणी राहील व त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

कापसाचा किती असेल वापर

यावर्षी देशात 165 लाख गाठ्ठे वापरले जाऊ शकतात. मार्चपर्यंत देशात 251.26 लाख गठ्ठ्यांचा साठा अपेक्षित होता, त्यापैकी 95 लाख कापड गिरण्यांमध्ये असून 156.26 लाख गाठ्ठे कापूस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र फेडरेशनकडे आहेत. या वर्षात लॉकडाऊन होण्यापूर्वी कापसाची मागणी यंदा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. हे प्रमाण 330 लाख गाठी असल्याचे म्हटले जाते. (Good news for cotton farmers, bumper earnings will be available this year, exports will also increase by 20%)

इतर बातम्या

दौंड तालुक्यातील नानगावच्या महिलांनी ॲमेझॉनवर गोवऱ्या विकल्या, तेलंगाणामधून वाढती मागणी

Double masks COVID-19 : दोन मास्क घालताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

Follow Us
शिवरायांच्या जयघोषाने मुंबई विमानतळ दणाणले...
शिवरायांच्या जयघोषाने मुंबई विमानतळ दणाणले....
देशाचा अपमान सहन करणार नाही; राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
देशाचा अपमान सहन करणार नाही; राऊतांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका.
राज्याच्या बजेटकडून खूप अपेक्षा; विजय वडेट्टीवारांचं विधान
राज्याच्या बजेटकडून खूप अपेक्षा; विजय वडेट्टीवारांचं विधान.
राजकारणात पैशाची चटक वाढवू नका; राज्यसभा निवडणुकीवर राऊतांचे वक्तव्य
राजकारणात पैशाची चटक वाढवू नका; राज्यसभा निवडणुकीवर राऊतांचे वक्तव्य.
रोहित पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; काय आहे कारण?
रोहित पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; काय आहे कारण?.
संभाजीनगरमध्ये पाण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची सेना आक्रमक
संभाजीनगरमध्ये पाण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची सेना आक्रमक.
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक.
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी.
एफआयआर दाखल होणार का? सीआयडीच्या भूमिकेवर रोहित पवारांचं प्रश्नचिन्ह
एफआयआर दाखल होणार का? सीआयडीच्या भूमिकेवर रोहित पवारांचं प्रश्नचिन्ह.
युद्धखोरांविरोधात उभं राहायची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही; राऊतांची टीका
युद्धखोरांविरोधात उभं राहायची सत्ताधाऱ्यांची हिंमत नाही; राऊतांची टीका.