AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural News : चांगला पाऊस झाल्याने रब्बी पिकाला फायदा, कोरड्या चाऱ्याचे दर वाढले

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अती पावसामुळं ओळा चारा खराब झाला असल्याचं शेतकरी सांगत आहेत.

Agricultural News : चांगला पाऊस झाल्याने रब्बी पिकाला फायदा, कोरड्या चाऱ्याचे दर वाढले
dhule farmerImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 10, 2023 | 10:32 AM
Share

धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यात चांगला पाऊस (heavy rain) झाला असला तरी पशुपालकांना चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. असं असलं तरी कोरडा चारा मिळणं कठीण झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सध्या जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध आहे. मात्र तो चारा जनावरांना कायम खाऊ घालता येत नाही. त्यामुळे थोडा कोरडा चारा जनावरांना लागतो. मात्र कोरड्या चाऱ्याचे भाव गग्नाला भिडले आहेत. प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची मोठी अडचण पाहायला मिळते. यावेळी शेतकऱ्यांना (dhule farmer) कोरडा चारा मिळत नसल्यामुळे मोठी अडचण झाली आहे.

रब्बी पिकांना त्याचा फायदा झाला

धुळे जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी पिकांना त्याचा फायदा झाला. शेतात हिरवा चारा देखील उपलब्ध आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी हिरव्या चाऱ्याची जिल्ह्यात टंचाई नाही. मात्र असे असताना कोरडा चारा मात्र भेटत नाही. कोरड्या चाऱ्याचे भाव तीन हजार रुपये शेकडा पेंढी झाले आहे. तेही जिल्ह्यात भेटत नाही. कोरडा चारा हा थेट गुजरात येथील बुरुज येथून आणावा लागतो. त्यामुळे जनावरांना उन्हाळ्यात काय खाऊ घालावे घालावे असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.

दिवसभर हिरवा चाराच खाऊ घालता येत नाही

एकीकडे उत्पादन केलेल्या शेती पिकांना भाव नाही. दुसरीकडे शेती शेतीसाठी लागणाऱ्या जनावरांना चारा नाही त्यामुळे करावं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. गारपिटीमुळे हिरवा चारा देखील खराब झाला आहे. तो ही कमीच आहे, जनावरांना दिवसभर हिरवा चाराच खाऊ घालता येत नाही. थोड्या प्रमाणात कोरडाचारा देखील द्यावा लागतो. मात्र तो चारा भेटत नसल्याने टंचाई निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने काहीतरी उपाय करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

अती पावसामुळं ओळा चारा खराब झाला

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. अती पावसामुळं ओळा चारा खराब झाला असल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्याचबरोबर कापडीला आलेल्या पीकांना सुध्दा पावसाचा फटका बसला आहे.

एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.