AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पहिल्यांदाचं पाऊस आल्यामुळे औरंगाबादकर नागरिक ही सुखावून गेले

महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पाऊस
MANSOON UPDATEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2023 | 3:48 PM
Share

नाशिक : नाशिकच्या (NASHIK) कळवण, सुरगाणा येथील घाट माथ्याला लागून असलेल्या भागाला पावसाने (MAHARASHTRA RAIN UPDATE) चांगलेच झोडपले आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांची छते देखील उडाली आहेत. कनाशी, अभोना, बोरगावसह परिसराला पावसाने झोडपले असले, तरी उकाड्यापासून हैराण झालेल्यांना काहीशा (MANSOON RAIN UPDATE) दिलासा मिळाला आहे.

कसमादे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागातील देवळा, कळवण, बागलाण तालुक्यांत मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाला. काही ठिकाणी मुसळधार आणि कुठे पावसाच्या हलक्या सरी झाल्याने बळीराजा सुखावला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावासाने ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेकांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस योग्य असल्याचे सांगत पेरणीची तयारी करण्यास सुरवात केली होती.

छत्रपती संभाजीनगर शहरात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पहिल्यांदाचं पाऊस आल्यामुळे औरंगाबादकर नागरिक ही सुखावून गेले, मुसळधार पडत असलेल्या पावसाचा औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील व्हिडीओ समोर आलेला आहे. जालना रोडवरच्या पादचारी पुलावरून घेतलेला व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेतोय. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर रांगा लागल्या होत्या.

लांबलेल्या मान्सूनमुळे शेतकरी राजा हताश झाल्याचं चित्र रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोरड्या वातावरणामुळे खरीपाच्या पेरण्या लांबवणीवर पडल्या आहेत. अनेकांच्या नजरा मान्सून कधी येणार याकडे लागल्या आहेत. तर अजूनही पेरणी करण्यासाठी शेतकरी धजावत नाहीयेत.

वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान

बीडच्या धारूर परिसरात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यात गोपाळपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय सौर उर्जे सह इतर साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.