AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू

कारला गावालगत नव्याने पुल बांधकाम झाले असून त्यामुळे शेतीच्या कडेने नाल्या देखील काढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते.

Nanded : नांदेडात पावसाचा हाहाकार, शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू
नाल्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडात घडली आहे.
| Updated on: Jun 27, 2022 | 4:44 PM
Share

नांदेड : गेल्या मिहन्याभरापासून गायब असलेल्या (Heavy Rain) पावसाने आता मराठवाड्यात रौद्ररुप धारण केले आहे. यामध्ये नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये तर गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. (Nanded Farmer) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड हे आपल्या शेतीकडे जात असताना मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यात वृध्द (Farmer Death) शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. त्यामुळे महिन्यापासून दडी मारलेला पाऊस आता सक्रीय झाला असून ढगफुटीसदृश्य या पावसामुळे अधिकचे नुकसानच होऊ लागले आहे. एकीकडे पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण यामुळे मनुष्यहानीही झाली आहे.

नेमकी कशी घडली घटना?

कारला गावालगत नव्याने पुल बांधकाम झाले असून त्यामुळे शेतीच्या कडेने नाल्या देखील काढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कारला गावासह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे रात्रीतून शिवारातील नाल्यांना पुर आला होता. रविवारी सकाळी पिकांची उगवण झाली की नाही पाहण्यासाठी शेतकरी चंदर टोपाजी जुकुंटवाड घरून आपल्या शेताकडे गेले होते.परंतु ते दुपार पर्यंत घरी परतले नसल्यामुळे घरच्या मुलांनी शेताकडे जाऊन शोधाशोध केला परंतु वडील दिसत नसल्यामुळे रानोमाळ फिरुन कुठेही दिसून आले नाही यातच गावालगत असलेल्या रस्त्यावरील नाल्यात हातातील काठी आढळून आली .यावरून शोध घेतला असता त्याच नाल्यात मृतदेह आढळून आला आहे.

घटनेची नोंद पोलिस ठाण्यात

शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती बोरगडी सज्जाचे तलाठी आमनवाड यांना देण्यात आली. महसूल प्रशासनाकडून मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे तलाठी यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक भुसनुर यांनी देखील भेट देऊन कुटुंबियाचे सांत्वन केले. कारला येथील वृध्द शेतकऱ्याचा पहिल्याच मुसळधार पावसामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता सदरील शेतकऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

कोणत्या पिकांचे नुकसान ?

आता पाऊस प्रमाणात असता तर कदाचित याचा फायदा या पिकांना झाला असता. मात्र, ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि बियाणेही पाण्यात गेली आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती पण काही मंडळात पावसाने थैमान घातले आहे. जांभळा येथील ओढे, नाले हे तुडुंब भरुन वाहत आहेत. मात्र, पेरलेल्या आणि उगवण झालेल्या पिकांचेही नुकसान झाल्याने पंचनामे करुन मदतीची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.