निफाड परिसरात रिमझिम पाऊस, वातावरणात पसरला गारवा; अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता

संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं.

निफाड परिसरात रिमझिम पाऊस, वातावरणात पसरला गारवा; अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता
निफाडमध्ये पडलेला पाऊस Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 7:24 AM

नाशिक – येत्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रासह (maharashtra) अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (Weather department)वर्तवण्यात आली होती. त्यामुळे काल राज्यात अनेक ठिकांणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. अशा वातावरणामुळे हवामानात उकाडा प्रचंड वाढला असल्याने नागरिकांना काल उकाड्याचा प्रचंड त्रास झाला असणार त्याचबरोबर निफाड (niphad) परिसरात दिवसभर आभाळ दाटून आलेलं होत. नागरिकांना काल उकाड्याचा प्रचंड त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सायंकाळच्या सुमारात काल परिसरात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. 20 मिनिटे पडलेल्या पावसाने परिसरात रात्री लोकांना चांगला गारवा जाणवला तर उकाड्यापासून सुटका झाली. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक पीकांवर त्याचा परिणाम होणार आहे. काढणीला आलेल्या पीकांवर पाऊस झाल्याने नेमकं कोणत्या पिकाचं नुकसान झालंय हे उद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शेतक-यांचं नुकसान

नाशिक जिल्ह्यात काल दिवसभर आकाशात आभाळ असल्याने जिल्ह्यात अनेकांना उकाड्याचा त्रास झाला. पण रात्री पडलेल्या पावसाने अनेकांना दिलास दिला परंतु शेतक-यांच्या पीकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या कांदा,गहू आणि द्राक्ष या पिकांना झालेल्या पावसाचा फटका बसला असल्याची अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. कारण झालेल्या पावसामुळे आत्तापर्यंत अनेकांचे नुकसान झालेले पाहायला मिळते. कोरोनाच्या काळातून आता कुठे शेतकरी सावरायला लागला होता. परंतु हवामान बदलाचा परिणाम पुन्हा शेतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल पाऊस झाला आहे.

हवामान वेधशाळेने वर्तविलेला होता अंदाज

संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मध्य महाराष्ट्रात काल आणि आज गारपिटीची शक्यता असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. मध्य भारतात पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान,गुजरात,पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय.महाराष्ट्रात ताशी 40 कि.मी वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तसेच अनेक ठिकाणी पावसाची हजेरी देखील असेल.

युद्धाच्या भूमित प्रेमाचं गुलाब फुललं, रशियापुढे नाही पण तिच्यापुढे त्याने आपसूक गुडखे टेकले

Child care : लहान मुलांच्या तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी हे उपाय करा, तोंड नेहमी राहील निरोगी!

Palghar Accident : पालघरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, कार चालकाचा मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.