एकदा लागवड अन् वर्षभर कमाई, खरीप-रब्बी हंगामात घेता येणारे पिक

काळाच्या ओघात केवळ शेतामधील मुख्य पिकांवरच उत्पादन वाढेल असे नाही. तर पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा झाला आहे. शेतकरी आता भाजीपाला, फळबाग याची लागवड करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. पण दोन्ही हंगामात घेता येणाऱ्या काकडीच्या लागवडीतूनही वर्षभर कमाई करता येते.

एकदा लागवड अन् वर्षभर कमाई, खरीप-रब्बी हंगामात घेता येणारे पिक
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 2:44 PM

मुंबई : काळाच्या ओघात केवळ शेतामधील मुख्य पिकांवरच उत्पादन वाढेल असे नाही. तर पीक पध्दतीमध्ये बदल गरजेचा झाला आहे. शेतकरी आता भाजीपाला, फळबाग याची लागवड करुन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. पण दोन्ही हंगामात घेता येणाऱ्या काकडीच्या लागवडीतूनही वर्षभर कमाई करता येते. यासाठी गरज आहे ती वैज्ञानिक पध्दतीने लागवडीची. खरीप आणि रब्बी हंगामात काकडीचे उत्पादन घेतले तर वर्षभर यातून शेतकऱ्यांना पैसे कमवता येणार आहेत.

काकडी हे देशभरात पिकवलेले भारतीय पीक आहे. विशेष: महाराष्ट्रातील कोकन विभागात काकडीचे अधिकचे उत्पादन घेतले जाते. अधिकचा पाऊस यासाठी पोषक आहे त्यामुळे कोकण परिसरात काकडीचे लागवड क्षेत्र हे जास्त आहे. महाराष्ट्रात तब्बल 3711 हेक्टरावर काकडीचे उत्पादन घेतले जात आहे. काकडीपासून कोशिंबीर बनवली जाते. त्यामुळे ही भाजी आहारात रोज वापरली जाते.

हवामान अन् योग्य हंगाम कोणता?

काकडी हे उष्ण व कोरड्या हवामानात पिकवलेले पीक आहे. मध्यम दर्जा असलेल्या जमिन क्षेत्रावर काकडी ही अधिक जोमात वाढते. या करिता पाण्याचा निचरा होणारे शेत जमिन क्षेत्र गरजेचे आहे. पाणी जमिनीत साठवून राहिले कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. खरीप आणि उन्हाळ्याच्या हंगामात घेतले जाणारे पिक आहे. जून-जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात खरीप हंगामासाठी काकडीची लागवड ही केली जाते

दोन वाणाचे अधिकचे उत्पादन

थंड भागात घेतले जाणारे उत्पादन – थंड काकडीचे उत्पादन हे जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात घेतले जाते. लागवडीनंतर 45 दिवसांनी फळ लागवडीला सुरवात होते. त्याची फळे हिरव्या रंगाची असतात. एका काकडीचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. हेक्टरी उत्पन्न 30 ते 35 टन असते.

पूना काकडी – ही काकडी हिरव्या आणि फिक्कट पिवळ्या रंगाची असते. उन्हाळ्यात ह्या काकडीची वाढ जोमात होते तर प्रति हेक्टरी 13 ते 15 टन उत्पन्न मिळते.

लागवडी पूर्व घ्यावयाची काळजी

काकडीची लागवड करण्यापूर्वी शेत जमिन ही उभी व आडवी नांगरणे महत्वाचे आहे, यामधील तण काढून शेतजमिनीची मशागत करुन लागवडीचे क्षेत्र हे सुपिक करुन घ्यावे लागणार आहे. शेतात 30 ते 50 बैलगाड्या कुजलेले खताच्या टाकावे लागणार आहे. उन्हाळी काकडीची लागवड ही 60 ते 75 सेंमी अंतर ठेऊन करावी लागणार आहे. खरीप हंगामात कोकण भागात काकडी लावायचे असेल तर 90 सेंमी अंतरा हे दोन्ही बाजूंचे अंतर असावे तर दोन्ही सरीतील अंतर हे ३ मीटर ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रावर दोन बियाणांच्या मधले अंतर हे योग्य असल्यास उत्पादनात वाढ होणार आहे.

खत आणि पाण्याचा वापर

काकडीचे पीक पेरण्यापूर्वी 50 किलो एन, ५० किलो पी. तर पेरणीच्या 1 महिन्यानंतर 50 किलो नायट्रोजनचा दुसरा डोस द्यावा लागणार आहे. पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागणार आहे.

तोडणी आणि उत्पादन

काकडी योग्य पोसल्यावरच त्याची तोडणी सुरु करावी. योग्य पोसलेल्या काकडीलाच बाजारात दर चांगला मिळतो. काकडीची तोडणी ही दर दोन ते तीन दिवसांनी करावी. बदलत्या वातावरणानुसार उत्पादन ठरते. हवामानानुसार काकडीचे उत्पन्न हेक्टरी 200 ते 300 क्विंटल दरम्यान बदलते.

संबंधित बातम्या :

Special Story! सोयाबीन दरवाढीच्या पडद्यामागची गोष्ट, शेतकऱ्यांनी दाखवले एकीचे ‘बळ’

लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ‘तारणारी’ योजना, शेतीमाल साठवणुकीचीही सोय

PM Kisan : सरकारने नियम बदलले! आता ‘या’ कागदपत्राशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.