AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ

शेती व्यवसायात अनंत अडचणींचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागतो. शिवाय कष्ट करुनही पदरी मोबदला पडत नाही. काळाच्या ओघात आता शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. पण प्रत्येक बदल स्वीकारावा अशी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नाही पण जे आवश्यक आहे त्यामध्ये तर बदल करावाच लागणार आहे. त्याच अनुशंगाने सिंचन हे महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादन क्षमता ही वाढणारच नाही. म्हणूनच शेतीमध्ये सौर कृषी पंप हा महत्वाचा ठरत आहे.

शेती व्यवसयात सौरकृषी पंपाचे महत्व, योग्य नियोजनामुळे उत्पादनातही वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 2:32 PM
Share

लातूर : शेती व्यवसायात अनंत अडचणींचा सामना हा (Farmer) शेतकऱ्यांना करावा लागतो. शिवाय कष्ट करुनही पदरी मोबदला पडत नाही. काळाच्या ओघात आता शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. पण प्रत्येक बदल स्वीकारावा अशी देशातील शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता नाही पण जे आवश्यक आहे त्यामध्ये तर बदल करावाच लागणार आहे. त्याच अनुशंगाने सिंचन हे महत्वाचे आहे. त्याशिवाय उत्पादन क्षमता ही वाढणारच नाही. म्हणूनच शेतीमध्ये (Solar Agriculture Pumps) सौर कृषी पंप हा महत्वाचा ठरत आहे.

अनियमित वीज पुरवठा, कमी दाबाने पुरवठा शिवाय तांत्रिक बिघाड यामुळे पिकांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे सौर कृषी महत्वाचा ठरत आहे. सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंपांनामुळे बऱ्याच प्रकारच्या फायदा होत आहे. सौर कृषी पंपाचे फायदे काय याची माहिती आपण घेणार आहोत.

कमी खर्चात अधिकचा फायदा

सौर उर्जेवर चालणाऱ्या कृषी पंप मोफत मिळणाऱ्या सूर्य प्रकाशापासून चालतो. याकरीता वीज आणि डिझेलसारख्या महागड्या इंधनांवर अवलंबून राहायची गरज राहत नाही. तसेच त्याला चालवण्यासाठी परत-परत पैसे टाकायची सुद्धा गरज येत नाही. सूर्यप्रकाशामुळे सोलर पॅनल चार्ज होते. त्यामुळे गरजेनुसार सौर कृषी पंपला चालवून पाण्याचा उपयोग करू शकतो.

महागड्या इंधनांची गरज नसते

कृषीपंपाला पर्यांय म्हणून इंजिन हे समोर आले होते. पण याकरिता मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता होती. हे डिझेलवर आधारित असल्याने खूप खर्चिक बाब होती. पण सौर कृषी पंपला इतर ऊर्जास्रोतांची गरज राहत नाही. सौर कृषी पंपासाठी फक्त सूर्य प्रकाश आणि सोलर पॅनलची आवश्यकता असते. त्यामुळे हा पॅनल आपण कुठल्याही कोपऱ्यात पिकांना पाणी पोहोचू शकतो. सौर कृषी पंप यांच्या वापरामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणात आत्मनिर्भर होत आहेत.

सौरकृषी पंप हा पर्यावरणानुकूल

सौर कृषी पंपामुळे कुठल्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. हे पर्यावरणासाठी अनुकूल आहे. कारण सौर कृषी पंपाला अशा कुठल्याही इंधनाने चालवले जात नाही, ती त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल. या कृषी पंपाद्वारे कुठलाही हानिकारक पदार्थ वातावरणात सोडला जात नाही. त्यामुळे पर्यावरण प्रदूषणाचा समस्या दूर होते. सौर ऊर्जेच्या मदतीने कृषी पंप चालवणे फार सोपे आहे. कारण यामध्ये फार कमी प्रमाणात उपकरणांची आवश्यकता असते. तसेच पारंपारिक कृषी पंपप्रमाणे विजेची कपात, कमी होल्टेज यासारख्या समस्या येत नाहीत. ज्या ठिकाणी विजेचा पुरवठा होत नाही, त्याठिकाणी सौर कृषी पंप एक वरदान ठरत आहेत.

पाण्याचा योग्य वापर

उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यामध्ये सोलर पॅनल जास्त उन्हामुळे भरपूर प्रमाणात चार्ज होतात. तसेच पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सोलर एनर्जी कमी प्रमाणात तयार होते. सौर कृषी पंपाच्या वापरामुळे जास्त खर्च येत नाही. सौर त्यामुळे तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा ऊर्जा ग्रेडला विकून उत्पन्नात एक चांगला स्त्रोत निर्माण होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

‘ई-पीक पाहणी’ नंतर आता राज्य सरकारचे नवे धोरण, शेतकऱ्यांची वाढणार जाबाबदारी

पोषक वातावरण असतानाही रब्बी हंगाम धोक्यात, काय आहेत कारणं?

वातावरण बदलाचा परिणाम माशांच्या दरावर, इंदापूर बाजार समितीमध्ये घटली आवक

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.