AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वातावरण बदलाचा परिणाम माशांच्या दरावर, इंदापूर बाजार समितीमध्ये घटली आवक

बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा शेती पिकावर परिणाम झाला आहे त्याचप्रमाणे शेतीच्या जोडव्यवसायावरही होत आहे. वाढणारी थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे इंदापूर कृषी बाजार समितीमध्ये मासाळी बाजारात आवक घटली आहे. तर दुसरीकडे माश्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

वातावरण बदलाचा परिणाम माशांच्या दरावर, इंदापूर बाजार समितीमध्ये घटली आवक
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 12:09 PM
Share

इंदापूर : बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा शेती पिकावर परिणाम झाला आहे त्याचप्रमाणे शेतीच्या जोडव्यवसायावरही होत आहे. वाढणारी थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे इंदापूर कृषी बाजार समितीमध्ये मासाळी बाजारात आवक घटली आहे. तर दुसरीकडे माश्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. वातावरणामुळे मासेमारीसाठी अडचणी निर्माण होत असल्याने आवक घटत आहे. शिवाय अशीच स्थिती राहिली तर मात्र, माशांच्या दरामध्ये अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हिवाळ्यात पाऊस आणि ऊनाचीही अनुभती नागिकांना येत आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे मासेमारीत अडचणी निर्माण होत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माशांची आवक ही 30 टक्क्यांनी घटलेली आहे. तर दरामध्ये 20 ते 60 रुपयांनी वाढ झालेली आहे.

कसा झाला आहे परिणाम?

इंदापूर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. थंडी आणि ढगाळ वातावरण असल्याने मासाळी बाजारात माश्यांची आवक ही 30 टक्क्यांनी घटलेली आहे. मागील दोन आठवड्यापर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मासाळी बाजारात चिपालीची आवक ही 16 ते 20 टन होती. ती आता 12 ते 15 टनावर आली आहे. मरळ मासा हा 300 ते 400 किलो येत होता तो आता 200 ते 300 किलोवर आला आहे. रोहू व कटला यांची आवक 1600 ते 2000 किलो होत होती. ती आत्ता 1000 ते 1200 किलोवर आली आहे.

आवक घटल्याने दरात वाढ

आवक कमी होत असल्याचा थेट परिणाम आता माशांच्या दरावर होत आहे. दिवसभरात होणाऱ्या आवकनुसार दर हे ठरत आहेत. वांब पूर्वी 250 ते 350 रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत होती. ती आत्ता 300 ते 500 रुपयांवर पोहचली आहे. चिलापी 20 ते 100 रुपयांना मिळत होती. तर आता 30 ते 140 रुपयां दर पोहोचले आहेत.

ग्राहकांच्या रांगा

आवक कमी असल्याने बाजारात मासे दाखल होताच. त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे खवय्ये सकाळपासूनच मासे खऱेदी करण्यासाठी करण्यासाठी गर्दी करीत आहे. मात्र, वातावरण असेच राहिल्यास अजून आवक कमी होऊन त्याचा दरावर परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या :

दिवसाकाठी 150 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ, चार दिवसांपासून सातत्य

निलंग्यात राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा अन् दहाव्या दिवशीही होणार दहाव्याचा विधी 

तयारी आगामी खरीप हंगामाची, कसे केले जाते बीजोत्पादन?

VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!.
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला
काँग्रेसच्या मांडीवर बसून शेण तुम्हीच खल्लंय! बन यांचा राऊतांना टोला.
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश
महापौर रितू तावडेंचे अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाईचे आदेश.
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल
आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? शंभुराज देसाईंचा थेट सवाल.