AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत

यंदाच्या मोसमातील मिरच्यांची सर्वाधिक आवक नंदूरबारच्या प्रसिद्ध मिरची बाजारात आली आहे. देशातील हा दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारात मिरच्या मोठी आवक आल्याने मिरचीचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत
Nandurbar Red ChilliesImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 17, 2024 | 1:21 PM
Share

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदूरबार | 17 जानेवारी 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक येत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीच्या व्यवहार बंद होता. मात्र सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मिरचीची खरेदी पुन्हा सुरु झाली असली तरी जादा आवक झाल्या मिरचीचे दर चांगलेच घसरले आहेत. सध्या मिरचीला दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेट म्हणून नंदूरबारला ओळखले जाते. यंदाच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्वींटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिने मिरच्याचा आवक सुरुच रहाणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. आधीच यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसुल होत नसल्याने शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

खर्चही वसुल होईना

सध्या मिरचीला दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणी तसेच वाहतूकीचा खर्च मोठा आहे. परंतू त्याप्र्माणात भाव मिळत नसल्याचे बळीराजा नाराज आहे. यामुळे केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी रवींद्र मराठे आणि रामकृष्ण चौधरी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मिरचीची पावडरला चांगला भाव मिळतो. मग शेतकऱ्यांच्या मिरचीला का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
खासगी विमानात बिघाड झाला, 45 मिनिटे उशीर तरी... VSR कंपनीतील विमानाची
खासगी विमानात बिघाड झाला, 45 मिनिटे उशीर तरी... VSR कंपनीतील विमानाच्या प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?