AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत

यंदाच्या मोसमातील मिरच्यांची सर्वाधिक आवक नंदूरबारच्या प्रसिद्ध मिरची बाजारात आली आहे. देशातील हा दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारात मिरच्या मोठी आवक आल्याने मिरचीचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत
Nandurbar Red ChilliesImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 17, 2024 | 1:21 PM
Share

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदूरबार | 17 जानेवारी 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक येत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीच्या व्यवहार बंद होता. मात्र सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मिरचीची खरेदी पुन्हा सुरु झाली असली तरी जादा आवक झाल्या मिरचीचे दर चांगलेच घसरले आहेत. सध्या मिरचीला दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेट म्हणून नंदूरबारला ओळखले जाते. यंदाच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्वींटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिने मिरच्याचा आवक सुरुच रहाणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. आधीच यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसुल होत नसल्याने शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

खर्चही वसुल होईना

सध्या मिरचीला दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणी तसेच वाहतूकीचा खर्च मोठा आहे. परंतू त्याप्र्माणात भाव मिळत नसल्याचे बळीराजा नाराज आहे. यामुळे केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी रवींद्र मराठे आणि रामकृष्ण चौधरी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मिरचीची पावडरला चांगला भाव मिळतो. मग शेतकऱ्यांच्या मिरचीला का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.