AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत

यंदाच्या मोसमातील मिरच्यांची सर्वाधिक आवक नंदूरबारच्या प्रसिद्ध मिरची बाजारात आली आहे. देशातील हा दुसऱ्या क्रमांकाची मिरची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजारात मिरच्या मोठी आवक आल्याने मिरचीचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Nandurbar Red Chillies | नंदूरबार बाजारपेठेत यंदा मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत
Nandurbar Red ChilliesImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 17, 2024 | 1:21 PM
Share

जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नंदूरबार | 17 जानेवारी 2024 : देशातील दुसऱ्या क्रमांकांची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक येत आहे. आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. पुढील दीड महिना मिरचीची आवक अशीच सुरू राहण्याचे अंदाज बाजार समितीने व्यक्त केला आहे. मिरचीची आवक जादा असल्याने मिरचीचा दर घसरला आहे. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीच्या व्यवहार बंद होता. मात्र सोमवारपासून पुन्हा बाजार समिती सुरू झाली आहे. मिरचीची खरेदी पुन्हा सुरु झाली असली तरी जादा आवक झाल्या मिरचीचे दर चांगलेच घसरले आहेत. सध्या मिरचीला दोन हजार पासून ते चार हजारपर्यंतचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेट म्हणून नंदूरबारला ओळखले जाते. यंदाच्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणातही यंदा येथे मोठ्या प्रमाणात मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतीत यंदा मिरचीची विक्रमी आवक आली आहे. आतापर्यंत दोन लाख क्वींटल मिरच्यांची खरेदी येथे झाली आहे. पुढील दीड महिने मिरच्याचा आवक सुरुच रहाणार असल्याचा अंदाज आहे. मिरचीचा पुरवठा जादा झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. आधीच यंदाच्या अनियमित पावसाने शेतकरी आधीच संकटात असताना आता मिरचीच्या विक्रीतून खर्चही वसुल होत नसल्याने शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

खर्चही वसुल होईना

सध्या मिरचीला दोन ते चार हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मिरचीच्या लागवडीसाठी त्यानंतर फवारणी आणि काढणी तसेच वाहतूकीचा खर्च मोठा आहे. परंतू त्याप्र्माणात भाव मिळत नसल्याचे बळीराजा नाराज आहे. यामुळे केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे शेतकरी रवींद्र मराठे आणि रामकृष्ण चौधरी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मिरचीची पावडरला चांगला भाव मिळतो. मग शेतकऱ्यांच्या मिरचीला का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.