AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इगतपुरीत गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांसह बळीराजाच्या स्वप्नांचा झाला चिखल

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या धक्क्यातून सावरत असतांना रब्बीने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.

इगतपुरीत गारांचा पाऊस, रब्बीच्या पिकांसह बळीराजाच्या स्वप्नांचा झाला चिखल
Image Credit source: Google
| Updated on: Mar 06, 2023 | 5:11 PM
Share

शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : सोमवारी मध्यरात्री नाशिक जिल्ह्यातील ( Nashik News ) बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा पाहायला मिळाला. मात्र, इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री गारांचा पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसाने ( Unseason Rain )  होत्याचे नव्हते केले आहे. रब्बीच्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. रब्बी हंगामासह काढून ठेवलेला शेतमाल देखील यामध्ये भिजून त्याचा चिखल झाल्याने तोंडचा घास गेल्याची परिस्थिती बळीराजाची झाली आहे. गारांचा पाऊस झाल्याने शेतात असलेला शेतमाल सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने घातलेले हे थैमान बळीराजाच्या डोळ्यात अश्रु आणणारे आहे.

सोमवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाच्या दरम्यान गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांबरोबर रब्बीचे पीकही शेतकाऱ्यांच्या पदरी निराशाच देणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका पुन्हा एकदा बसला आहे.

रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कांद्यासह गहू, मूग, हरभरा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्याची पोळ करून ठेवली होती, तर काही पिके ही काढणीला आली होती ती देखील झोडपून निघाली आहे. तर काही पिके अजूनही पाण्यात आहे.

काही तासांच्या पावसात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. अद्यापही पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय गारांचा पाऊसही झाल्याने रब्बीचे पीक हातातून जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

रविवारी दिवसभर असलेला उन्हाचा तडाका आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी झालेला मुसळधार पासून याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहे.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना याचा मोठा फटका बसला आहे. कुऱ्हेगाव,गोंदे दुमाला, मुंढेगाव, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे,नांदुरवैद्य या गावात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी अशी मागणी करू लागले आहे.

बहुतांश ठिकाणी काढणीला आलेले गहू हे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे गहू काढणीचा खर्च वाढणार आहे. आधीच खरीपाच्या पिकांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रब्बीचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. एकूणच नाशिकच्या शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.