AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात.

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!
उत्पादनात घट झाल्याने डाळींच्या दरात वाढ झाली आहे.
| Updated on: May 13, 2022 | 3:36 PM
Share

मुंबई : एकतर शेतीमालाचे दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाहीच पण ठरलेले दरही शेतकऱ्यांच्या मालाला मिळेल असे नाही. त्यामुळे पिकवणाऱ्यापेक्षा विक्री करणाऱ्याला व्यापाऱ्यांनाच अधिकचा फायदा होत आहे. किरकोळ बाजारात डाळींच्या दराने 120 रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे तर ठोक बाजारपेठेमध्ये डाळीचे दर 80 ते 90 रुपये किलो असे आहेत. डाळींच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना. मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत.शिवाय आवक घटल्यामुळेही सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

ठोक बाजार अ्न किरकोळ विक्रीमधील तफावत

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात. त्यामुळेच बाजारपेठेतील दर आणि किरकोळ दर यामध्ये 22 रुपये ते 36 रुपयांची तफावत आहे.

अशी आहे दरातील फरक

मुंबई बाजार समितीमध्ये तूर 90 रुपये किलो तर किरकोळ बाजारपेठेत 120 रुपये किलो असे दर आहेत. चणा खुल्या बाजारपेठेत 60 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 90 रुपये, मसूर डाळ 84 रुपये तर किरकोळमध्ये 120 रुपये किलो याप्रमाणे दरात तफावत आहे. वाढत्या तफवातीचा फायद कष्टकऱ्यांना होणे गरजेचे आहे. मात्र, येथे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते हेच अधिकचा फायदा करुन घेत आहेत.

उत्पादनातही मोठी घट

निसर्गाच्या लहरीपणाचा तेवढाच परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाली आहे. सर्वच डाळींचे उत्पादन घटले होते. त्यामुळे विक्रमी दर मिळतील अशी अपेक्षा होती पण याचा थेट लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. शेतकरी ठरवून दिलेल्या किंमती शेतीमालाची विक्री तर करतात. पण त्यापेक्षा किरकोळ व्यापारी यांना अधिकचा फायदा आहे. त्यामुळे उत्पादन घटूनही दरवाढीचा अधिकचा फायद विक्रेत्यांना झालेला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.