AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात.

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!
उत्पादनात घट झाल्याने डाळींच्या दरात वाढ झाली आहे.
| Updated on: May 13, 2022 | 3:36 PM
Share

मुंबई : एकतर शेतीमालाचे दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाहीच पण ठरलेले दरही शेतकऱ्यांच्या मालाला मिळेल असे नाही. त्यामुळे पिकवणाऱ्यापेक्षा विक्री करणाऱ्याला व्यापाऱ्यांनाच अधिकचा फायदा होत आहे. किरकोळ बाजारात डाळींच्या दराने 120 रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे तर ठोक बाजारपेठेमध्ये डाळीचे दर 80 ते 90 रुपये किलो असे आहेत. डाळींच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना. मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत.शिवाय आवक घटल्यामुळेही सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

ठोक बाजार अ्न किरकोळ विक्रीमधील तफावत

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात. त्यामुळेच बाजारपेठेतील दर आणि किरकोळ दर यामध्ये 22 रुपये ते 36 रुपयांची तफावत आहे.

अशी आहे दरातील फरक

मुंबई बाजार समितीमध्ये तूर 90 रुपये किलो तर किरकोळ बाजारपेठेत 120 रुपये किलो असे दर आहेत. चणा खुल्या बाजारपेठेत 60 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 90 रुपये, मसूर डाळ 84 रुपये तर किरकोळमध्ये 120 रुपये किलो याप्रमाणे दरात तफावत आहे. वाढत्या तफवातीचा फायद कष्टकऱ्यांना होणे गरजेचे आहे. मात्र, येथे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते हेच अधिकचा फायदा करुन घेत आहेत.

उत्पादनातही मोठी घट

निसर्गाच्या लहरीपणाचा तेवढाच परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाली आहे. सर्वच डाळींचे उत्पादन घटले होते. त्यामुळे विक्रमी दर मिळतील अशी अपेक्षा होती पण याचा थेट लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. शेतकरी ठरवून दिलेल्या किंमती शेतीमालाची विक्री तर करतात. पण त्यापेक्षा किरकोळ व्यापारी यांना अधिकचा फायदा आहे. त्यामुळे उत्पादन घटूनही दरवाढीचा अधिकचा फायद विक्रेत्यांना झालेला आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.