AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात.

Mumbai Market : डाळींच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना नव्हे व्यापाऱ्यांना फायदा..!
उत्पादनात घट झाल्याने डाळींच्या दरात वाढ झाली आहे.
| Updated on: May 13, 2022 | 3:36 PM
Share

मुंबई : एकतर शेतीमालाचे दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाहीच पण ठरलेले दरही शेतकऱ्यांच्या मालाला मिळेल असे नाही. त्यामुळे पिकवणाऱ्यापेक्षा विक्री करणाऱ्याला व्यापाऱ्यांनाच अधिकचा फायदा होत आहे. किरकोळ बाजारात डाळींच्या दराने 120 रुपये किलो पर्यंत मजल मारली आहे तर ठोक बाजारपेठेमध्ये डाळीचे दर 80 ते 90 रुपये किलो असे आहेत. डाळींच्या दरवाढीचा फायदा ना शेतकऱ्यांना आहे ना ग्राहकांना. मध्यस्ती असलेले व्यापारीच अधिकचा नफा कमावत आहेत.शिवाय आवक घटल्यामुळेही सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

ठोक बाजार अ्न किरकोळ विक्रीमधील तफावत

ठोक बााजार म्हणजे ज्या बाजार समितीध्ये शेतकरी शेतीमाल घेऊन येतो त्या ठिकणी तुरीच्या 1 कोलो डाळीसाठी 90 रुपये मोजावे लागतात तर किरकोळ मध्ये हेच व्यापारी हे ग्राहकांना 120 रुपयांप्रमाणे विक्री करतात. केवळ तूरच नाही तर चणा, मसूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. शिवाय बाजारपेठेतील आवक घट झाल्याचे मार्केटींग करुनही दर वाढवून घेत असतात. त्यामुळेच बाजारपेठेतील दर आणि किरकोळ दर यामध्ये 22 रुपये ते 36 रुपयांची तफावत आहे.

अशी आहे दरातील फरक

मुंबई बाजार समितीमध्ये तूर 90 रुपये किलो तर किरकोळ बाजारपेठेत 120 रुपये किलो असे दर आहेत. चणा खुल्या बाजारपेठेत 60 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 90 रुपये, मसूर डाळ 84 रुपये तर किरकोळमध्ये 120 रुपये किलो याप्रमाणे दरात तफावत आहे. वाढत्या तफवातीचा फायद कष्टकऱ्यांना होणे गरजेचे आहे. मात्र, येथे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते हेच अधिकचा फायदा करुन घेत आहेत.

उत्पादनातही मोठी घट

निसर्गाच्या लहरीपणाचा तेवढाच परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाली आहे. सर्वच डाळींचे उत्पादन घटले होते. त्यामुळे विक्रमी दर मिळतील अशी अपेक्षा होती पण याचा थेट लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. शेतकरी ठरवून दिलेल्या किंमती शेतीमालाची विक्री तर करतात. पण त्यापेक्षा किरकोळ व्यापारी यांना अधिकचा फायदा आहे. त्यामुळे उत्पादन घटूनही दरवाढीचा अधिकचा फायद विक्रेत्यांना झालेला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.