AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर

आता सर्वकाही सुरळीत असताना गेल्या 5 दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. निफाड तालुक्यात अधिकचा पारा घसरल्याने हुडहुडी भरत आहे. अशा परस्थितीमध्येही शेतकऱ्यांना स्वत: पेक्षा काळजी आहे ती द्राक्ष बागांची. वाढत्या थंडीमुळे फुगवणीच्या अवस्थेतील मण्यांना तडा जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकरी हे द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून वातावरण उबदार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Nashik | वाढत्या थंडीने हुडहुडी शेतकऱ्यांना का द्राक्षांना ; बागांमध्ये का पेटत आहेत शेकोट्या? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Dec 26, 2021 | 2:48 PM
Share

नाशिक : द्राक्षाचे उत्पादन पदरी पडेपर्यंत शेतकऱ्यांना काय-काय करावे लागेल याचा नियम नाही. अवकाळी पावसानंतर एकरी 5 ते 7 हजार रुपये खर्ची करुन शेतकऱ्यांनी बागा जोपासल्या खऱ्या मात्र, या ( danger to vineyards) बागांवरील विघ्न काही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. आता सर्वकाही सुरळीत असताना गेल्या 5 दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. ( Increase in cold in Nashik) निफाड तालुक्यात अधिकचा पारा घसरल्याने हुडहुडी भरत आहे. अशा परस्थितीमध्येही शेतकऱ्यांना स्वत: पेक्षा काळजी आहे ती द्राक्ष बागांची. वाढत्या थंडीमुळे फुगवणीच्या अवस्थेतील मण्यांना तडा जाण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकरी हे द्राक्ष बागेत शेकोट्या पेटवून वातावरण उबदार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वाढत्या थंडींमुळे नेमके काय होते नुकसान?

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यात थंडीची लाटच आहे. वाढलेली थंडी ही द्राक्ष बागांसाठी चांगली नसते. यामुळे द्राक्षांच्या मण्यांना तडे जातात, शिवाय वाढ खुंटते, वेलींची कार्यक्षमता मंदावते, घडकूज होते एवढेच नाही तर द्राक्षांध्ये साखर उतरण्याची प्रक्रियाच मंदावते. त्यामुळे गोडवा कमी होतो. यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी आता थंडीच्या कडाक्यात शेत जवळ करुन द्राक्ष बागेच शेकोट्या पेटवत आहे. त्यामुळे उबदार वातावरण होत आहे.

द्राक्षेच्या बागेसाठी कष्ट घ्यावे तरी किती?

एकतर द्राक्षाची लागवड केली की फवारणी, मशागत यासारखी कामे सुरु होतातच. यंदा तर द्राक्षाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. अतिवृष्टी, अवकाळी आणि त्यानंतर वाढलेली रोगराई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वर्षभर जोपासलेली बाग सोडून द्यायची कशी म्हणून शेतकऱ्यांनी हातऊसणे घेऊन का होईना बागेची जोपासना केली आहे. हे कमी म्हणून की काय आता वाढत्या थंडीचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी वाढत्या थंडीचा विचार न करता थेट शेत जवळ करुन शेकोट्या पेटवत आहेत. विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवल्या जात आहेत. त्यामुळे मणीगळ होणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आंबा पिकाला मात्र, वाढत्या थंडीचा फायदा

सलग 21 दिवस जर तापमानात घट झाली आणि थंडीचा जोर वाढला तर त्याचा परिणाम थेट आंब्यावरील मोहरावर होणार आहे. किमान थंडीमुळे का होईना मोहर वाढतोय ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. साधारणत: कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो याशिवाय नैसर्गिक मोहरही वाढतो. दुसऱ्या टप्प्यात मोहराविणा राहिलेल्या बागा आता वाढत्या बहरतील आणि उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवलेला आहे. पडलेली थंडी 15 दिवस कायम राहिली तर मोहर फुटण्यास मदतगार राहील. पोषक वातावरण राहिल्यास यंदाचा हंगाम चांगला राहील असेच संकेत आहेत.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो पुढे धोका आहे | हरभऱ्याचे क्षेत्र वाढले पण दराचे काय, अधिकच्या दराला सरकारच्या निर्णयाचा अडसर

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे | पेरणीपुर्वची बिजप्रक्रिया अन् असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला.

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला