AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?

नाशिक येथील इदगाह मैदानावर गेल्या 5 महिन्यांपासून बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बाजार समितीच्या गैरप्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. अखेर पोलीसांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढले आहे. एवढेच नाही आंदोलनाची भूमिका घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती.
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 1:18 PM
Share

नाशिक : आजही आंदोलनासारख्या लोकशाही मार्गाचा अवलंब करुन न्याय मागितला जातो. या भूमिकेमुळे अनेकांना न्याय मिळतोही. देशातील प्रत्येकाला आंदोवलनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, (Nashik Agricultural Income Market Committee) नाशिक येथील इदगाह मैदानावर गेल्या 5 महिन्यांपासून बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बाजार समितीच्या गैरप्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांनी (Employees’ Agitation) आंदोलन सुरु केले होते. अखेर (Police Action) पोलीसांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढले आहे. एवढेच नाही आंदोलनाची भूमिका घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

सहभागी कर्मचाऱ्यांना न्याय नव्हे निलंबन

गेल्या 153 दिवसांपासून येथील इदगाह मैदनात कृषी बाजार समिती संचालकाच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरु होते. शांततेत आंदोलन सुरु असून एवढ्या दिवसानंतर का होईना न्याय मिळेल अशी भावना कर्मचाऱ्यांची झाली होती. अखेर हे आंदोलन तर मोडीत काढण्यात आले आहेच. शिवाय जे कर्मचारी या आंदोलनात नियमित उपस्थित होते त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या कारवाईमागे नेमके कोण असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कोट्यावधींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यापेक्षा कर्मचाऱ्यांवरच कारवाई हा कुठला न्याय अशी भावना कर्मचाऱ्यांची झाली आहे. पोलीसांनी आंदोलन मोडीत काढले बाजार समिती प्रशासनाने या सहभागी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे आता कर्मचारी काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

काय होत्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच शिवाय या गैरकारभाराची चर्चा सबंध बाजारपेठेत होत आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे बाजार समितीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे संचालक मंडळातील सभापतीपासून सदस्यांपर्यंत चौकशी करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र काढले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना येथील लोकप्रतिनीधींनी. प्रतिकूल परस्थितीमध्ये आंदोलन सुरुच होते. अखेर पोलीस प्रशासनाने हे आंदोलन मोडीत काढले आहे. त्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

पोलीसांच्या कारवाईला कुणाचे पाठबळ ?

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मोठ्या प्रमाणात आहे. कांद्याची तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र, जेवढ्या प्रमाणात उलाढाल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असल्याचा कर्मचारी संघटनेने केला आहे. गेल्या 153 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर पोलीसांनी हे आंदोलन मोडीत काढले आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत पोलीसांनी ही भूमिका का घेतली हा प्रश्न कायम आहे. आंदोलनामध्ये देखील राजकारण झाले असल्याचा कर्मचारी संघटनेचे निलेश दिंडे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे | पेरणीपुर्वची बिजप्रक्रिया अन् असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा ‘ताल’, समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.