AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?

नाशिक येथील इदगाह मैदानावर गेल्या 5 महिन्यांपासून बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बाजार समितीच्या गैरप्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. अखेर पोलीसांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढले आहे. एवढेच नाही आंदोलनाची भूमिका घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

Nashik | 153 दिवसांचे आंदोलन अन् साध्य काय झाले आंदोलनकर्त्यांचे निलंबन, काय आहे नेमका प्रकार ?
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती.
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 1:18 PM
Share

नाशिक : आजही आंदोलनासारख्या लोकशाही मार्गाचा अवलंब करुन न्याय मागितला जातो. या भूमिकेमुळे अनेकांना न्याय मिळतोही. देशातील प्रत्येकाला आंदोवलनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, (Nashik Agricultural Income Market Committee) नाशिक येथील इदगाह मैदानावर गेल्या 5 महिन्यांपासून बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. बाजार समितीच्या गैरप्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांनी (Employees’ Agitation) आंदोलन सुरु केले होते. अखेर (Police Action) पोलीसांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे मोडीत काढले आहे. एवढेच नाही आंदोलनाची भूमिका घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले आहे.

सहभागी कर्मचाऱ्यांना न्याय नव्हे निलंबन

गेल्या 153 दिवसांपासून येथील इदगाह मैदनात कृषी बाजार समिती संचालकाच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरु होते. शांततेत आंदोलन सुरु असून एवढ्या दिवसानंतर का होईना न्याय मिळेल अशी भावना कर्मचाऱ्यांची झाली होती. अखेर हे आंदोलन तर मोडीत काढण्यात आले आहेच. शिवाय जे कर्मचारी या आंदोलनात नियमित उपस्थित होते त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या कारवाईमागे नेमके कोण असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कोट्यावधींचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यापेक्षा कर्मचाऱ्यांवरच कारवाई हा कुठला न्याय अशी भावना कर्मचाऱ्यांची झाली आहे. पोलीसांनी आंदोलन मोडीत काढले बाजार समिती प्रशासनाने या सहभागी कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे आता कर्मचारी काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

काय होत्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच शिवाय या गैरकारभाराची चर्चा सबंध बाजारपेठेत होत आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे बाजार समितीच्या प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे संचालक मंडळातील सभापतीपासून सदस्यांपर्यंत चौकशी करण्याची मागणी येथील कर्मचाऱ्यांनी केली होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र काढले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना येथील लोकप्रतिनीधींनी. प्रतिकूल परस्थितीमध्ये आंदोलन सुरुच होते. अखेर पोलीस प्रशासनाने हे आंदोलन मोडीत काढले आहे. त्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

पोलीसांच्या कारवाईला कुणाचे पाठबळ ?

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मोठ्या प्रमाणात आहे. कांद्याची तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र, जेवढ्या प्रमाणात उलाढाल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असल्याचा कर्मचारी संघटनेने केला आहे. गेल्या 153 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर पोलीसांनी हे आंदोलन मोडीत काढले आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत पोलीसांनी ही भूमिका का घेतली हा प्रश्न कायम आहे. आंदोलनामध्ये देखील राजकारण झाले असल्याचा कर्मचारी संघटनेचे निलेश दिंडे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे | पेरणीपुर्वची बिजप्रक्रिया अन् असे करा लष्करी अळीचे व्यवस्थापन

Red Chilly : नंदुरबारच्या बाजारपेठेत लाल मिरचीचा ‘ताल’, समितीच्या मैदानावरही वाहनांच्या रांगाच रांगा

काय सांगता ? महाराष्ट्र अग्रिमन अधिनिर्णय प्राधिकरणाच्या निर्णयामुळे शेतकरीही गेले चक्रावून, हळद म्हणे…

Follow Us
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.