AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात

साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.

साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Oct 06, 2021 | 5:30 PM
Share

मुंबई : देशात वर्षागणिक साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे. यंदा (India) भारतातील साखर कारखान्यातून (Sugar Factory) तब्बल 72. 3 लाख टन साखरेची निर्यात झालेली आहे. साखर  व्यवसायात असलेल्या ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ISTA)या संस्थेने ही माहिती दिली आहे. तर साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.

‘एस्टा’ च्या म्हणण्यानुसार 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या हंगामात भारताने इंडोनेशियाला सर्वाधिक साखर निर्यात केली आहे. सन 2020-21 मध्ये एकूण निर्यातीपैकी 70.6 लाख टन साखर निर्यात झाली आहे. तर सुमारे 1,66,335 टन साखर दान केली जात असल्याचे समोर आले आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुमारे 1.5 दशलक्ष टन किंमतीचे निर्यात सौदे करण्यात आले आहेत. आगामी अधिवेशनात अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखाने हे या संधीचा फायदा घेतील. शिवाय पुढील हंगामातही 60 लाख टनांपर्यंत साखर निर्यात देशातून होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवीन हंगामासाठी 15 लाख टन साखरेचे सौदे

एस्टाच्या म्हणण्यानुसार, 2020-21 या वर्षात सुमारे 60 लाख टन साखर सरकारी अनुदानासह आणि 7.85 लाख टन अनुदानाशिवाय निर्यात करण्यात आली. इंडोनेशियाला सर्वाधिक निर्यात 18.2 लाख टन असून त्याखालोखाल अफगाणिस्तानला (6,69,525 टन), संयुक्त अरब (यूएई) ला (5,24,064 टन) तर सोमालियाला (4,11,944 टन) निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

चालू हंगामातही भारताकडे निर्यातीची संधी

दुसरीकडे थायलंडमध्येही साखरेचे उत्पादन हे वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांचे उत्पादन हे वाढलेले आहे. असे असले तरी भारताच्या सर्वसाधारण उत्पादनाच्या 30 ते 35 लाख टन हे त्यांचे उत्पादन कमीच राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातही साखर निर्यात करण्यात भारतातील साखर कारखान्यांना मोठी संधी आहे. शिवाय थायलंडची साखर ही जानेवारी 2022 मध्ये बाजारात दाखल होणार आहे.

निर्यातीमधून अधिकचे उत्पन्न

उत्पादनात घट झाल्याने जागतिक बाजारपेठेत साखरेची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्राझीलचे उत्पादन हे जगात सर्वाधिक असले तरी जानेवारी 2022 नंतर आणि एप्रिल 2022 नंतरच ब्राझीलची साखर बाजारपेठेत येणार आहे. त्यापुर्वी साखर निर्यातीचा फायदा हा भारतामधीलच साखर कारखान्यांना होणार आहे. वाढीव उत्पादनाबरोबरच साखरेची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखर कारखान्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगामाला 15 ऑक्टोंबरपासून सुरवात

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप 15 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहेत. त्या अनुशंगाने गत महिन्यात मंत्रा मंडळाची बैठक झाली असून यामध्ये हा निर्णय झाला आहे. (India ranks second in the world in sugar production; Record exports this year too)

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या काढणीला वेग ; दराचे भवितव्य अंधारात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी

हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत...

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..